क्षणातल्या कविता, कथा, चारोळ्या, लेख..
नमस्कार, माझ नाव पियुष प्रकाश खांडेकर. कविता आणि चारोळ्या टोपण नावाने लिहितो. माझ्या काही कविता तुमच्या समोर सादर करतोय. तुमचा अभिप्राय नक्की कळवा !! कविता जास्त करत नाही पण खूप सा-या चारोळ्यांचा आस्वाद नक्की घ्या.. मृदुंग / क्षण ! संपर्क :- "क्षणातच" पि.ओ.बॉक्स नं. ६७, जळगाव हेड पोस्ट ऑफिस. जळगाव-४२५००१, दूरध्वनी : ७३८७९२२८४३
Wednesday, December 31, 2025
नव्याने..!
नमस्कार,
मी पियुष खांडेकर
लेखक-स्टोरीटेलर,
मराठी चित्रपट, नाटक, मालिका आदींसाठी लिखाण
संपर्क - ७३८७९२२८४३
kshanatch@gmail.com
Hello,
I Piyush Khandekar
Author-storyteller,
Writing for Marathi films, plays, serials etc.
Contact - 7387 9 22843
kshanatch@gmail.com
Wednesday, November 17, 2021
ललना..! :-)
गालबोट घेऊन हळदीचे
सौभाग्याचे धनी झालेत,
आतुर कामातुर ललनेचे
काजळही ऋणी झालेत..!
- ✍ मृदुंग®
#kshan #writer #author
नमस्कार, मी पियुष खांडेकर लेखक-स्टोरीटेलर, मराठी चित्रपट, नाटक, मालिका आदींसाठी लिखाण संपर्क - ७३८७९२२८४३ kshanatch@gmail.com
.
Hello, I Piyush Khandekar Author-storyteller, Writing for Marathi films, plays, serials etc. Contact - 7387 9 22843 kshanatch@gmail.com
Monday, July 26, 2021
राजा आणि रंक..! :-)
..आपल्या घरात आपण राजा आणि आपणच रंक असतो. त्यामुळे आलेल्या राजाचे राजासारखे आणि रंकाचे रंकासारखेच आदरातिथ्य करावे. कारण घर आपल्या कष्टाचं, संस्कारांच आणि पिढीचं वडिलोपार्जित आहे. त्यात हुकूमशाही पण आपलीच आणि राज्यही आपलेच असते. कारण चौकटीत आलेली शूर्पणखा आणि रावण आपला मृत्यू सोबत घेऊन गेले होते. दान मागितले म्हणूनच मिळते हे विधीलिखित दानपत्रात खोडले जाऊन मृत्यूने अधोरेखित केले जाते. त्यामुळे एखाद्याच्या घरात पायतानासकट वावरण्यास मुभा मिळाली याचा अर्थ त्यांच्या घराची दार बाहेर जाण्यासाठी उघडे आणि पायातली पायताने चिखलाने भरलेला रस्ता तुडवण्यासाठी सुसज्ज असावी असे सुचवितात. कारण काही मनावरची लक्तरे रुतलेल्या खिळ्यासारखी आयुष्यभर वागवावी लागतात. ती प्रवासात थांबून काढताही येत नाही आणि पुढे चालताही येत नाही. जे थांबले ती जोडपी एकटी होतात आणि जी चालत राहतात ती सोबत असतात एकमेकांकडे विरुद्ध तोंड करुन..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३
#writer #author #books #stories #attitude #igo #culture #doublestandard
नमस्कार, मी पियुष खांडेकर लेखक-स्टोरीटेलर, मराठी चित्रपट, नाटक, मालिका आदींसाठी लिखाण संपर्क - ७३८७९२२८४३ kshanatch@gmail.com
.
Hello, I Piyush Khandekar Author-storyteller, Writing for Marathi films, plays, serials etc. Contact - 7387 9 22843 kshanatch@gmail.com
Wednesday, July 21, 2021
डास..! :-)
डास..!
..शिक्षण जास्त असणाऱ्यांच्या पदरात परिस्थितीने कायम काही ना काही कमी पडत असते. त्यांची भूक प्रत्येक बाबतीत अधाशी बकासुरासारखी असते. अन् त्यांना हेवा कायम दुसऱ्याचा वाटत राहतो. अशी लोक आरशासमोर जात नाहीत. कायम दुसऱ्याच्या नजरेतून स्वतःच आयुष्य आणि स्वतःच्या नजरेतून इतरांचे आयुष्य बघत राहतात. त्यामूळे ना परिस्थिती बदलते ना समाज घडतो. निव्वळ डासांसारखी त्यांची भूनभून करणारी पैदास वाढत राहते..!
(मॉस्किटो किलर)
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३
#writer #mosquitohunter #killer #shayar #lifelessons #struggle #writersblock #coffee
नमस्कार, मी पियुष खांडेकर लेखक-स्टोरीटेलर, मराठी चित्रपट, नाटक, मालिका आदींसाठी लिखाण संपर्क - ७३८७९२२८४३ kshanatch@gmail.com
.
Hello, I Piyush Khandekar Author-storyteller, Writing for Marathi films, plays, serials etc. Contact - 7387 9 22843 kshanatch@gmail.com
Saturday, July 17, 2021
लॉटरी..! :-)
लॉटरी..!
..आपली परिस्थिती बदलण्यासाठी लग्नाचा आधार घेतल्यावर; बदललेल्या आणि सध्या असलेल्या परिस्थितीबद्दल असूया व्यक्तीच्या मनात खरचं असू शकते का? नाते औपचारिक झाल्यावर माणूस यंत्र होतो अन् त्याच्या कृती यांत्रिक! आपली परिस्थिती बदलण्यासाठी लग्न एकमेव पर्याय ज्यांना वाटतो; ते लॉटरीच्या तिकीटासारखे आयुष्य जगतात. ज्यांचं नाण खणखणीत असते त्यांचे हरवलेले नाणेही भरभराट करत असते. पण! परिस्थितीने आणि परिस्थितीमुळे लाचार बनलेल्या किंवा झालेल्यांना हे कळत नाही..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३
#lottery #writer #author #books #stories #writersblock #thoughts #sympathy
नमस्कार, मी पियुष खांडेकर लेखक-स्टोरीटेलर, मराठी चित्रपट, नाटक, मालिका आदींसाठी लिखाण संपर्क - ७३८७९२२८४३ kshanatch@gmail.com
.
Hello, I Piyush Khandekar Author-storyteller, Writing for Marathi films, plays, serials etc. Contact - 7387 9 22843 kshanatch@gmail.com
Saturday, July 3, 2021
शोकांतिका..! :-)
..ज्याप्रकारे लग्न लादलं जातं त्याचप्रकारे आईपण आणि बापपण होणंही समाजातून लादलंच जातं. त्यामुळे आजचे आई-वडिल हे मुलांचे निव्वळ पालक होतात. मुलांचे संगोपन करणारे सामाजिक घटक दुसरेच बनतात. आणि मुलं हाताबाहेर गेलेली केस बनतात ही शोकांतिका आहे..!
- ✍ मृदुंग®
#writer #author #books #thoughts #life #parents #partner
नमस्कार, मी पियुष खांडेकर लेखक-स्टोरीटेलर, मराठी चित्रपट, नाटक, मालिका आदींसाठी लिखाण संपर्क - ७३८७९२२८४३ kshanatch@gmail.com
.
Hello, I Piyush Khandekar Author-storyteller, Writing for Marathi films, plays, serials etc. Contact - 7387 9 22843 kshanatch@gmail.com
Thursday, July 1, 2021
अघोर..! :-)
.. तंत्रविद्येत तेवणाऱ्या दिव्यावर फुंकलेल्या हळदीचेही दुष्परिणाम होतात.. जखम भरणारी हळद जीव घेणारी कशी होऊन जाते? थांगपत्ताही लागत नाही.. अघोरी सत्य एवढं विद्रूप असतं.. दिवंगत असतं आणि शाश्वतही..!
(अघोर)
- ✍ मृदुंग®
#aghora #writer #club #author #mystery #midnight #scared #scary
नमस्कार, मी पियुष खांडेकर लेखक-स्टोरीटेलर, मराठी चित्रपट, नाटक, मालिका आदींसाठी लिखाण संपर्क - ७३८७९२२८४३ kshanatch@gmail.com
.
Hello, I Piyush Khandekar Author-storyteller, Writing for Marathi films, plays, serials etc. Contact - 7387 9 22843 kshanatch@gmail.com






