Powered By Blogger

Monday, August 10, 2026

अवस्था आयुष्याची..!


♥ क्षण..! ♥

मुसाफिर कॅफे..

अवस्था आयुष्याची..!

मानसाला स्वतःच्या मनावर नियंत्रण फार उशिराने मिळते.. काही वेळा असे जाणवून जाते की, फार लवकर घटना घडल्यात..तर काही वेळा जाणवते वेळ झालीये पण हवं ते घडतंच नाही..काळाच्या पुढे आणि वेगाच्या दरम्यान हरवतात ती स्वप्ने आणि जपून ठेवलेले क्षण..
पावले चालतात, घड्याळाची काटेही टिक-टिक करत पुढे सरकू लागतात..मन तेव्हाही अस्वस्थचं..जणू आता एखाद्या स्वप्नातून खऱ्या अर्थाने जाग येईल आणि आपण पून्हा त्या उंबरठ्यावर उभे राहू जिथून आपल्याला मागे किंवा पुढे चालायचेच नाही..
तुटलेल्या स्वप्नांची आणि हरवलेल्या क्षणांची सांगड घालतांना जोरात जागेवरच तुटतं ते हृदय.. अन्  या तुटलेल्या हृदयाची कळ निघते ती मनातून शरिरापर्यंत जी वास्तव हेलावून सोडते..तेव्हा घेतला गेलेला श्वासही मग जड झालेला असतो तो अंतःकर्णातून..ज्यावर अधिराज्य गाजते ते वेदनेचे..सत्ता कोसळते ती प्रेमाची..राज्य येते ते एकांताचे..अन् अवस्था होते ती आयुष्याची..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

#musafircafe #kshan #coffee #writerblock #path #waytoexpress


मुसाफिर कॅफे..!

♥ क्षण..! ♥

मुसाफिर कॅफे..!

सिरिज पाहता-पाहता मनाला स्पर्शून गेलं की, मीही जी गोष्ट.. बहुतेक अनेक गोष्टी ज्या जिथे अर्धवट सोडल्या तिथून त्या पूर्ण करुन घेऊन माझ्यातल्या लेखकाला जाग करावं आणि माझं अर्धवट लिखान वारंवार वाचून पूर्ण करण्यासाठी सपाटा लावणाऱ्या वाचकांना उपलब्ध करुन द्यावं..
 पण.. काही गोष्टी ह्या अर्ध्यातच परिपूर्ण असतात.. त्यांना पूर्ण करण्याचा घाट घालने हे त्या क्षणांचे महत्त्व आणि त्यांचे अस्तित्व पूसण्यासारखेच..
तरी वाटतं, आताच नाही प्रत्येक क्षणी वाटतं..करुन द्याव्यात सगळ्याच गोष्टी पूर्ण.. या अपूर्णत्त्वाचेही लेणं आता बरे नव्हे..
..करुन द्यावी पून्हा प्रवासाला सूरुवात.. जिथे माझ्यातला तो प्रत्येक क्षण मनमोकळा होईल..!

- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

#kshan #coffee #writersblock #travel #thinking #about 

Wednesday, December 31, 2025

नव्याने..!


नव्याने..!

जगला जो-तो ज्याचं-त्यांच आयुष्य,
मन मारुन किंवा...... आनंदाने..
मिळालंय ज्याचं-त्याला भरभरुन,
हवं तेही-नको तेही.... अनिच्छेने..
गमावलं ज्याने-त्याने बरंच काही,
तुटपुंजी उरली आहे.... नैतिकतेने..
शिल्लक-बाकी-एकाकी निर्ढावलेली,
काळजातली कळ बोलली.. वेदनेने..
सरल्या वर्षाला देऊन दे निरोप,
पुन्हा तेच जगणे-मरणे.... नव्याने..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३


#kshan #writer #author #newyear2026 #newstart #dairy #coffee #writersblock 
 

Wednesday, November 17, 2021

ललना..! :-)

 


गालबोट घेऊन हळदीचे

सौभाग्याचे धनी झालेत,

आतुर कामातुर ललनेचे 

काजळही ऋणी झालेत..!

- ✍ मृदुंग®

#kshan #writer #author 

 


Monday, July 26, 2021

राजा आणि रंक..! :-)

 ..आपल्या घरात आपण राजा आणि आपणच रंक असतो. त्यामुळे आलेल्या राजाचे राजासारखे आणि रंकाचे रंकासारखेच आदरातिथ्य करावे. कारण घर आपल्या कष्टाचं, संस्कारांच आणि पिढीचं वडिलोपार्जित आहे. त्यात हुकूमशाही पण आपलीच आणि राज्यही आपलेच असते. कारण चौकटीत आलेली शूर्पणखा आणि रावण आपला मृत्यू सोबत घेऊन गेले होते. दान मागितले म्हणूनच मिळते हे विधीलिखित दानपत्रात खोडले जाऊन मृत्यूने अधोरेखित केले जाते. त्यामुळे एखाद्याच्या घरात पायतानासकट वावरण्यास मुभा मिळाली याचा अर्थ त्यांच्या घराची दार बाहेर जाण्यासाठी उघडे आणि पायातली पायताने चिखलाने भरलेला रस्ता तुडवण्यासाठी सुसज्ज असावी असे सुचवितात. कारण काही मनावरची लक्तरे रुतलेल्या खिळ्यासारखी आयुष्यभर वागवावी लागतात. ती प्रवासात थांबून काढताही येत नाही आणि पुढे चालताही येत नाही. जे थांबले ती जोडपी एकटी होतात आणि जी चालत राहतात ती सोबत असतात एकमेकांकडे विरुद्ध तोंड करुन..!

- ✍ मृदुंग®

kshanatch@gmail.com

+९१ ७३८७९ २२८४३


#writer #author #books #stories #attitude #igo #culture #doublestandard 

 



Wednesday, July 21, 2021

डास..! :-)

 डास..!


..शिक्षण जास्त असणाऱ्यांच्या पदरात परिस्थितीने कायम काही ना काही कमी पडत असते. त्यांची भूक प्रत्येक बाबतीत अधाशी बकासुरासारखी असते. अन् त्यांना हेवा कायम दुसऱ्याचा वाटत राहतो. अशी लोक आरशासमोर जात नाहीत. कायम दुसऱ्याच्या नजरेतून स्वतःच आयुष्य आणि स्वतःच्या नजरेतून इतरांचे आयुष्य बघत राहतात. त्यामूळे ना परिस्थिती बदलते ना समाज घडतो. निव्वळ डासांसारखी त्यांची भूनभून करणारी पैदास वाढत राहते..!

(मॉस्किटो किलर)

- ✍ मृदुंग®

kshanatch@gmail.com

+९१ ७३८७९ २२८४३


#writer #mosquitohunter #killer #shayar #lifelessons #struggle #writersblock #coffee 

 



Saturday, July 17, 2021

लॉटरी..! :-)

 लॉटरी..!


..आपली परिस्थिती बदलण्यासाठी लग्नाचा आधार घेतल्यावर; बदललेल्या आणि सध्या असलेल्या परिस्थितीबद्दल असूया व्यक्तीच्या मनात खरचं असू शकते का? नाते औपचारिक झाल्यावर माणूस यंत्र होतो अन् त्याच्या कृती यांत्रिक! आपली परिस्थिती बदलण्यासाठी लग्न एकमेव पर्याय ज्यांना वाटतो; ते लॉटरीच्या तिकीटासारखे आयुष्य जगतात. ज्यांचं नाण खणखणीत असते त्यांचे हरवलेले नाणेही भरभराट करत असते. पण! परिस्थितीने आणि परिस्थितीमुळे लाचार बनलेल्या किंवा झालेल्यांना हे कळत नाही..!

- ✍ मृदुंग®

kshanatch@gmail.com

+९१ ७३८७९ २२८४३


#lottery #writer #author #books #stories #writersblock #thoughts #sympathy 

 



Saturday, July 3, 2021

शोकांतिका..! :-)

 ..ज्याप्रकारे लग्न लादलं जातं त्याचप्रकारे आईपण आणि बापपण होणंही समाजातून लादलंच जातं. त्यामुळे आजचे आई-वडिल हे मुलांचे निव्वळ पालक होतात. मुलांचे संगोपन करणारे सामाजिक घटक दुसरेच बनतात. आणि मुलं हाताबाहेर गेलेली केस बनतात ही शोकांतिका आहे..!

- ✍ मृदुंग®


#writer #author #books #thoughts #life #parents #partner