♥
♥ क्षण..! ♥
विनाकारण..! :-)
आपण जेव्हा एकटे पडतो. माणसं आपल्याला एकटे सोडतात तेव्हा आठवणी आपल्याला जगण्यासाठी बळ देतात. कधी रात्रीच्या गडद काळोखात डोळ्यातील अश्रू आपल्या सहवासाचा आधार होतात. तर कधी ओंजळीतून निसटलेल्या क्षणांचे सोबती होतात. अवचित नशिबाचे प्राक्तन म्हणून मिटल्या पापण्यांचे लुभावणे स्वप्ने होतात. म्हणूनच आयुष्याचा तेवढासा एकाकी प्रवास भावविभोर होत असतो. आठवणी दाटण्याचे आणि आठवणी आठवण्याचे आपल्याकडे एवढेच एक कारण विनाकारण असते..!
------------------------
पियुष (✍ मृदुंग®)
kshanatch@gmail.com

No comments:
Post a Comment