♥
♥ क्षण..! ♥
आक्रोश (2) ..!
घोडदौड सुरु झाली म्हणून नुसतं धावायचं नसतं. पाण्याचं तळ दिसलं की, तहानलेलं व्हायचं असतं, जरा विसवायच असतं आणि मागे असलेल्या गर्द दाट अंधारात पाण्याच्या होणाऱ्या खळखळाटीत आपलं सावज अचूक टिपायच असतं. तेव्हा कुठं एखादा श्रावण बळी पडतो. पुत्र वियोगाचा श्राप मिळतो आणि देखणा अंत विद्रुप होतो. अगदी त्याच क्षणाला फुटलेला टाहो फक्त शांततेने ऐकायचा असतो. कारण तो आक्रोश फक्त काळीज चिरणारा असतो आणि हुंदका आतल्याआत कोंडणारा..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

No comments:
Post a Comment