क्षण..!
कथेला रुचकर कसे बनवू..?
कथा-मालेत घडामोडी कमी झाल्या तर कागदावरचे लिखाण वाचकाला कमीच वाटते. वाचकांची तंद्री लागून सविस्तर केलेले निवडक प्रसंग फारसे मनात रुतुन बसत नाहीत. तेव्हा महत्व शुन्य असलेला प्रसंग शक्यतो वगळून घ्यावा. अथवा तोच प्रसंग नकरात्मक भुमिकेत मांडून तिरसटतेचा रुचकर नमुना बनवून सादर करावा लागतो. ते ही रुचते असे नसतेच मग सकारात्मकतेचा एक परिच्छेद लिहून उत्कंठा शिगेला ताणून ठेवावी लागते. जरा जरा वेळाने काही एक तथ्य नसलेला शब्दांचा व्यवहार असा अमुल्य ठेव्यात जमा होवून जातो. विनोद म्हणून अथवा विचारांची दिशा म्हणून..!
-------------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:
Post a Comment