♥
♥ क्षण..! ♥
कोजागिरी सरुन गेल्यावर..!
चांदणी रात्र भरात आली
चंद्राची गाठ घरात पडली,
बोलले ना ते शब्द काही
भेट अबोल स्वरात घडली..!
मना मनाचे हाल झाली
सुखाची एक चाल झाली,
नको करुस त्रागा आज
वेडी ती रात्र काल झाली..!
जी अत्तरे शब्दात दडली
ती उत्तरे कागदात नडली,
गळत्या पाकळ्यांत फुला
कळ्यांची मोजदात रडली..!
ऋतु बदलास ठेवतांना
हिरवे शालू पिवळी झाली,
जेव्हा भाकरच करपली
माझे आभाळ निळी झाली..!
चंद्राची चांदणी उरली
आणि पुनवेची रात्र सरली,
पैज लावून काळोखाशी
माझी उजेडाची हौस हरली..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:
Post a Comment