Powered By Blogger

Tuesday, October 24, 2017

दिसलं पाहिजे..! :-)


♥ क्षण..! ♥

दिसलं पाहिजे..!

..अम्म्म्म्म! लहान मुलांचा निरागस बाळबोधपणा दिसला पाहिजे. तसं म्हटलं तर श्रीमंतांची वैभवता त्यांच्या श्रीमंतीतून व प्रतिष्ठेतून जशी दिसून येते. अगदी तशीच गरीबाची कैवल्य आणि समाधानी वृत्तीसुद्धा दिसून येते. पण आपण बघावं का? हो! लोकांनी त्यांची डोळे तुम्हाला बघण्यासाठीच कार्यशील केलेली असतात. मुलगी बघायला गेलेल्या मंडळींचेच घ्या ना.. पदरात असलेल्या लावण्याचा बांधेसुदपणा जेवढ्या हावरटपणाने दिसून यावा यासाठी धडपड होते. तेवढीच पडद्यामागून संथ, तरल आणि मंजुळ आवाजात उत्तरे देणारी व्यक्तीही जरा अजून पुढे यावी अशी इच्छा होतेच. यात अपवाद अरसिक आणि दृष्टिहीन असूही शकतात. वाईट मुळीच नसेल आणि नसतंही. बघणाऱ्याचा दृष्टिकोन काय आहे हे समजलं पाहिजे. चांगलंच प्रत्येकाला हवं असतं. माझ्यापेक्षाही चांगलं तुला मिळेल किंवा सापडेलही असं ब्रेकअप करणारी प्रेमी युगुल एकमेकांना बोलून मोकळी होऊन जातात. त्यानंतर त्यांना पुन्हा तसं काही दिसतंच असं नसतं. बघायची भूमिका रसिक श्रोत्यांशीवाय आणि दगडाच्या बनविलेल्या विलोभनीय मूर्त्यांशीवाय अजून कुणाला चांगली वठवता आलेली नाही. इथे उपवर मुलगासुद्धा मुलगी बघायला/पाहायला जातो पण ती त्याला योग्यप्रकारे दिसली किंवा त्याने नीटसं पाहिलंच नसते. मग या क्षण दोन क्षणात पसंती देणाऱ्यांना काय साक्षात्कार होतो का? कि, यांच बघणं एवढं सराईत झालंय हेच कळत नाही. कदाचित साठ-सत्तर स्थळे जाऊन बघितल्याने असा अनुभव मिळतो? हे विचार करण्यासारखं आहे..
..तुम्हाला दृष्टी आहे आणि दिसतंसुद्धा चांगलं. एवढं चांगलं दिसतं की उनीदुनि सगळंच चव्हाट्यावर येऊन बोंबाबोंब करते. याला आणखी हातभार म्हणून मग माहिती मिळते. त्या मिळालेल्या माहितीला "समजणं" हा निव्वळ दैवाच्या मनातला सुप्त हेतू कळण्यात सामावलेला एक आनंद! पण दिसलं पाहिजेच! त्याशिवाय कळणार कसं? तोंड फाटकं प्रत्येकाचं असतं. त्यामुळे तोंड उचलून बोलायला आणि विचारायला काही कोणी येत नाही. आजकाल तर "नोटिस केलंय" हे पण ठोकून सांगावं लागतं. त्यात "इग्नोअर केलं" तर झालंच कल्याण!किती शतकं झालीत माहिती नाहीत. देव दिसावा म्हणून आजही पुजला जातोय. कारण तो दिसला पाहिजे म्हणूनच! दिसल्यानंतर काय? तुम्हाला "मोक्ष" कन्फर्म..
तर मुद्दा काय दिसलं पाहिजे. चांगलं-वाईट, सकारात्मकता-नकारात्मकता, गुण-दोष, चुका आणि गुन्हा हे दिसल्यावर मग कुठेतरी दृष्टिकोन बनतो. हा व्यक्तिसापेक्ष असला तरी याचं व्यंजन आणि वेगळं रसायन प्रत्येकाचं व्हेरी स्पेशल असतं. याला सर्वसामान्य "अनुभव" या सोप्या शब्दाने ओळखतात. माझी गृहीतके आणि गणिते या सोप्प्या गुणकारात सापडत नाही. एकमेकांना उगाच म्हणून सुरुवातीला भागायच कालांतराने वजा करायचं आणि आयुष्याच्या टर्निंग पॉइंटला बेरीज करून बाकी सांगायचं? अशी बरोबरीतली गणिते बेहिशेबी नजरांना कळणार कशी? दिसलं-पाहिलं-तोंड फिरवलं मागे मागचं राहून गेलं आणि पुढचं पुढे! काही दिसलं तर दिसलं पाहिजेच! जरा बघत चला! हल्ली सांभाळून राहण्याची गरज आहे. कसलाही गाजावाजा न करता. तेव्हाच दिसणार आपलं आणि दुसरा ढुंकून पाहणार. कारण त्याला इच्छा होणारच! अजून..थोडं अजून "दिसलं पाहिजे..!"
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Thursday, October 19, 2017

दरवळ..! :-)


Wednesday, October 18, 2017

क्षण आनंदाचे..! :-)


Monday, October 9, 2017

तुझी कथा..! :)


♥ क्षण..! ♥

तुझी कथा..! :)

तुझ्या कथेबद्दल मला बोलायचं नाही.. मी वाचलं एकदा नाही हजारदा.. इतकंच कळवणे मला जमले नाही.. तुझ्या कथेनेही मला वाटत चुगली केली नाही.. असो, तुझी कथा चांगली असूनही आवडली अजिबात नाही.. तुझं तू पण त्यात होतं "आपण" नव्हतोच.. त्यामुळे गुंतणे काही झाले नाही.. तुला विणकाम चांगले यायचे म्हणून शब्दांचे गुंफने जमले आहे.. दरम्यान वीण जरा विस्कटलीही... तू सवयीनुसार सारवासारव उत्तम केलीस.. कळणाऱ्याला ते कळलं असणारच म्हणा.. ठीक वाटलं, कथाच म्हणून सोडून दिलं.. तुझ्या कथेत कथानक आणि तुझी कथा कथक फार झालेत.. कदाचित, म्हणून तुझी कथा आत अशी पोहोचत नाही.. अधांतरी वाटते.. पण चालतेय वेगळं काही तरी म्हणून.. मुळात गुंता हवाच सोडवायला.. कोडी सोडवणं सोप्पय, कथेची कोंडी सोडवणं अवघड गेलं असणार.. हरकत नाही, प्रसिद्धीच्या झोताला एकदिवस अंधार ग्रासतोच.. कवाडं तेवढी नजरेची उघडी ठेवून राहा.. या अंधाराला चिरत येणार प्रतिष्ठेचा गंध गर्वाची नवीन कथा लिहून जाणार असतो.. तेव्हा तुझी कथा आणखीन खुलून दरवळेल.. शेवटी मात्र काही राहील तर ती फक्त.."तुझी कथा..!"
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Tuesday, October 3, 2017

चाल-ढकल..! :-)


♥ क्षण..! ♥

चाल-ढकल..! :-)

रात्री उशिराने अंधाराचा आधार घेऊन, पापण्यातून एक थेंब हळूच ओघळतो. कुणाला? स्वतःलासुद्धा नसेल, पण उशीला त्या थेंबाचं कारण आणि महत्त्व माहिती असतं. दिवसासाठी ओढलेला मुखवटा एवढ्या सहज गळून पडल्यावर, अंधाराची जी भीति वाटते ना ती मग इतर कुणाचीही वाटत नाही. अंधार सत्य आणि शाश्वततेची जाणिव करुन देऊ शकतो. दिवस या जाणिवेची उणीव भरुन काढू शकत नसतो. जी चाल-ढकल रोज करतो ना आपण ती याच आयुष्याची. आतल्या आत आणि मनातल्या मनात आपण आणखीन एक वेगळं आयुष्य जगत असतो. जे फक्त आपल्या स्वतःला माहीत असतं. याची वच्यता कुठे चुकून करावी किंवा ओघवती झाली देखील; तरीही आपण ती बंद ओठांच्या ओशाळ हसण्यावर अधांतरी तोलत ठेवत असतो. याचं मूळ कारण स्वतःने स्वीकारलं असतं तर मांडावे लागले नसते आणि स्वतःशीच भांडावे कधीच लागले नसते..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Friday, September 29, 2017

तुला कळणार नाही..! :-)


Thursday, September 28, 2017

मन हे बावरे..!


Wednesday, September 27, 2017

बाधित मृग..! :-)


Monday, September 25, 2017

उधार श्वास..! :-)


Saturday, September 16, 2017

.. सांगायचं म्हटलं तर.. :-)


 क्षण..! 
.. सांगायचं म्हटलं तर.. 
गोष्ट दोन अक्षरांची 'क्ष' 'ण'... एकत्र करुन लिहायचं म्हटलं, आठवण म्हणून जपायचं म्हटलं तर 'क्षण'... सहज, अगदी ठरवून! कायमचं विसरुन जायचं म्हटलं तर 'क्षण'... कधीतरी नकळत पलटावी मागची पाने... ओळी-ओळीवरून फिरावी नजर... शब्द खूप नाजूक आहे म्हणून पानांना सांभाळावित बोटे... शब्दाच्या अंगांगावरुन स्पर्श करतांना जाणवाव... लाजाळूच पान मिटण जेवढं हळवं असतं... एवढंच ते कोवळं वय असतं... तेवढाच निरागस आवेग... तितकाच टोकाचा मत्सर... तसलाच गंभीर आरोप... आणि तोच निष्ठुर 'क्षण'... माझा प्रवास, मी... आणि 'मी' एवढाच असणार कायम 'क्षण'..!
------------------------  मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३


Tuesday, August 8, 2017

बस किजीए..! :-)


बस किजीए..

बस किजीए अब सवाल करना
जो जवाब दे दु तो चुपचाप रहना,
खोमोश-ए-तनहाई शोर मचा दे
बडाही सुमसाम है ये आशियाना..
बस किजीए अब हमे युं टटोलना
हर रास्ते सफर की परख करना,
चलना जिम्मेदारिसे तुम रोजाना
अश्क-ए-इश्क का दस्तूर है बहना..
बस किजीए अब और नहीं कहना
ना हीं कुछ और है किसींसे सूनना,
हम कदम ताल कर के रोज चलेंगे
तुम कतार-ए-मौत में मिल लेना..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
73879 22843
#mythoughts  #mywriting #kshanatch  #Kabira #kshan #like4unforgotablememories #like4comment

कुछ इस तरहसे..! :-)


♥ क्षण..! ♥

कुछ इस तरहसे..

वक्त का सुरुर देखीये...
मुलाकाते होती थी
वक्त बितता नहीं गुजरता था..
अब वक्त मिलता नहीं..
मुलाकाते होती नहीं
और वक्त गुजरता तो है,
पर वक्त बितता नहीं..
शायद कुसुर अपना ही होगा
वरना बातें युं बातो बातो में
बनाई और बिगाडी नहीं होती..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
73879 22843
कुछ इस तरहसे जिंदगी को मैने आसान कर लिया..
किसी को दफा कर दिया, किसी को आझाद कर दिया..!

Thursday, July 27, 2017

प्रपंच..! :-)


♥ क्षण..! ♥

प्रपंच..!

मी:..चल राहू दे! तुला कशाला हवी सरीवर सर? उगाच अंगावर थेंबांचा असर? ओल तशीही तुझी तुला येते. घरभर वात्सल्याचा सुवास दरवळत ठेवते. मातीची ओढ, तिची तृष्णा आणि उपजण्याची किमया तुला कशाला उसनी हवी? म्हणून राहू दे...

ती: कितीही काही म्हटलेस तरी बाईचं बाईपण आणि स्त्रीचं स्त्रीपण जपून ठेवावं लागतं. उसनं असलं तरी. चौकट आणि उंबरठ्याचा भावबंद एक करतांना भिंतीही मला जिवंत ठेवायच्या आहेत. माझ्या पदराचा वास म्हणून तेव्हा माझं असं काय या घरात याचं उत्तर मला सापडेल. अन्यथा परक्याचं धन म्हणून मला माझ्या माहेरानी बालपणापासूनच तोडायला सुरवात केली होतीचं ना.. म्हणून उसन्या हव्यात सगळ्या गोष्टी माझ्या म्हणून...

मी: ..नाही कुठे म्हणतोय किंवा तुझं अस्तित्व कुठे नाकारुन पुसून काढतोय? शास्वत आहेच ना आणि शाबूत पण आहेच. मग हे सगळं नुसतं काहीतरीच नाही का..?

ती: ..तुला खरंच कळतंय का मी काय मागतेय? ते खरंच कळतंय तर तुला समजत तरी काय नाहीये? खिडक्यांची पडदे बदलावीत आणि पुन्हा घराची नवीन रंगरंगोटी करावी एवढी छोटी गोष्टचं आहे ही. पण तुझं नडतंय कुठे..?

मी: ..माझं काही नडत नाही. अडतपण नाही. बसलेल्या संसाराच्या घडीला पुन्हा विस्कटण्याची माझी इच्छा होत नाहीये...

ती: ..अच्छा! असं आहे तर. मग एक सांग घडी केलेली चादर पण चुरगळतेच ना? आतल्या आत ओल धरून तिची धागी कुजतातच ना? एकदा घडी उघडून ऊन दाखवायला नको..?

मी: ..तुला त्रास होईल. जो मला नको वाटतोय तुला पुन्हा व्हावा..!

ती: ..आठवणींचा कप्पा उघडला की, जखमा उघड्या पडतातच असं होत नसतं. त्रासाचं म्हणशील तर तो कप्पा उघडू न देण्याचा त्रास होतोय. हक्कय मला तर वर्तमानात आणि भविष्यातच पुढे-पुढे का जात राहू? थोडं मागेही डोकावून पाहू दे ना! कदाचित पुढचा प्रवास भूतकाळात डोकावून बदललेल्या वर्तमानाचा होऊ शकेल...

मी: ..ठीक आहे. तुझा हा स्त्री हट्ट मी पुरवणार पण माझी अट आहे. कोसळायचं न बिथरायचं नाही. विखुरलेलं रेंगाळत वेचत बसायचं नाही. प्रपंचात घुटमळत मुके हुंदके घ्यायचे नाहीत. एवढीच अट आहे माझी...

ती: ..कबूल..!

(..आयुष्याच्या मागच्या पानांवर लागलेली धूळ झटकल्यावर; तुमचं, माझं, आपलं-प्रत्येकाचं हे एक पुस्तक थोडं मागे जाऊन वाचण्यासारखं आहे. काही धागेदोरे हाताशी लागतीलही. काही गाठी पडतीलही. थोडं आयुष्य सैल झाल्यावर या गाठोड्यात काय मिळतं ते तुमचे तुम्हीच बघा. वाटलं तर कळवा पत्ता तुम्हाला माहिती आहेच..!

योग्यवेळी लख्ख प्रकाश 'उजाळे'..
कणकण सरकता आभाळ काळे,
बघ तुझे तुला काय-काय गवसते..
मला खुनावतायेत ती ही बंद ताळे..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Thursday, July 20, 2017

बधिर..! :-)


♥ क्षण..! ♥

बधिर..!

बाहेर मग धुंद
वादळाची एक रात्र,
माझ्या हातात
तुझे शेवटचे ते पत्र..
ख्याली खुशाली
कितीतरी सांत्वन,
अजूनही नंतरही
ओळीतही भिजणं..
तुला कळले नाही
मी कळवलेही नाही,
उत्तर देऊन देखील
प्रश्न मी केलेही नाही..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

'तू..!' :-)


♥ क्षण..! ♥

'तू..!'

कितीही आवरत घ्यावं किंवा थोपवतं घ्यावं म्हटलं तरी माझ्या मनातलं कागदावर उरतंच! न लिहिण्याची ताकीद, धमकी आणि आज्ञा होईपर्यंत थांबून राहायचं. गप्प बसायचं. कोरी कागदे सोडायची. न राहवून कागदे लिहून काढलीच गेली तर टराटरा फाडायची. आग लावून जाळून टाकायची. लिखाणाचा सराव विसरुन जायचे. संवादांची माध्यमे बदलत असतांना शब्दांची लोचने अंगीकारायची नसतात. तरीही सराव हवाच! निदान मांडता तरी यायला हवं. ढाचाच ढेपळाला तर मग लिखाण काही कामाचं नसत. विषयांची तुटक माहिती होते. अवघड लिहिण्याचा पिंड साधं, सोपं सहज लिहिण्याचा झाल्यावर प्रगल्भतेचा तो उच्च स्तर, पुन्हा सर करण्याची उर्मी आतमध्ये राहत नाही. लिहितोस मध्येच सोडतोस, गायब होतोस, लिहूनही कुणाला वाचायला देत नाहीस, बऱ्याचदा तर तोच-तोचपणा होतो. काहीतरी हरवल्या हरवल्यासारखं वाटत लिखाणात. मन लावून लिहिलेलं वाटत नाही. रोज वाचायला खेटे घालणारे लोकं लिहिलेलं रेटत वाचून काढतात. वेगळं त्या थराचे उमटवतांना स्वतःची गात्र पुलकित झाली नसतील तर कोणाच्या भावनांना कसले उमाळे येतील? आणि कागदावरच्या नजरेला डोहाळे कोणत्या गर्भधारणेची लागतील?
मैफल गाजवता येते. मैफल जगवता आली का कधी? सुखी आयुष्याचे प्राक्तन अधाशासारखं बकाबका हादडतांना निर्मळ कारुण्य उपभोगलेच नाही. मग सुरकूतलेलं तारुण्य कळण्याची आपली काय बिशाद? अंडी तडकायचा काय तो अवकाश भेग गेली की झालं. जीव येतोय की जातोय हे पाहायला वेळ कुणाला नाही. आपली पावलं प्रवाहाच्या दिशेने करायची. तोंड फिरवून घ्यायची आणि सरतेशेवटी संबंधही काढून घ्यायचे. एवढेच असते 'आयुष्यात' वर्तुळ स्वरूपात. प्रामाणिक स्वतःही स्वतःसोबत नसत कोणी. मग शब्दांचं काय? कागदांचे काय? विषयांचे तरी काय? उत्तर आहे का..? आहे ना उत्तर. ते माझे उत्तर म्हणजे  'तू'..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

लफडं बसलंय कोपऱ्यात..! :-)


♥ क्षण..! ♥

लफडं बसलंय कोपऱ्यात..!

शेवट गोड असलेली ती गोष्टचं.. सुरुवातीला दुःखाची झालर.. मध्यंतरात भूतकाळाचे वलय आणि वर्तमानात अवघडलेले, गोंधळलेले कोवळे सावज.. ज्याला तुम्ही, मी आणि जग हृदय म्हणतो.. हृदयांतराची नजरेने होत असलेली शस्त्रक्रिया जपून करावी लागते अन्यथा समाजाकडून लफडं नावाची शिवी ऐकावी लागते.. सोड ना.. मर्यादा, चारित्र्य, शील, आब्रु, घराणे, नाते, सप्तपदी कशाला 'बाजार'.. आपण 'मित्र' म्हणून राहू.. त्याच निखळ मैत्रीला मग.. 'लफडं बसलंय कोपऱ्यात'..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Thursday, July 13, 2017

मुंबईच्या पावसात भिजल्यानंतर..! :)


♥ क्षण..! ♥

मुंबईच्या पावसात भिजल्यानंतर..

प्रवाहाला गति, वाट चुकलेल्याला दिशा.. लिखाणाची थोडी देखील इच्छा नसतांना, विषयांचा रतीब.. पावसाच्या थेंबात मिठीत गुरफटलेली ती दोघे.. कचकच, चिडचिड न करता शांत संथतेत रेंगाळणारी ट्राफिक.. कटिंग चहासाठी जमलेला चारपाच मित्र/मैत्रिणींचा ग्रुप.. लोकलच्या दारात पाऊस झेलणारी तळहात.. गरमागरम भजी न वडापावची रेलचेल.. आपापल्या हिशेबाने/ स्टेट्सने जो तो पाऊस एन्जॉय करतो.. चारचाकीमधले दुचाकीस्वारांना भिजत जातांना पाहून तळमळतात.. दादर-धारावी रस्त्यावर टप्पोरी पोरं रस्त्यावर येऊन नाचतात.. हे सगळं थेंबांच्या असंख्य सुया टोचून घेतल्यावर.. चहाची मोडकी तोडकी टपरी डोक्यावर छपराची पांघरून घालते.. वाफळणारा चहा, अंगावर खेळणारा वारा धुंद करतो.. मन टवटवीत झालं असतं-नसतं तोच.. टवकारलेली कानं वेध घेतात.. लाईफ बहोत बिझी है साब.. फिर भी यहा हर किसिके पास बहोत टाईम है.. चहाचा अखेरचा घोट घेतला.. टपरिवाला "फिर आना साब, बंबई की बरीश मायूस नहीं करती.. और ट्राफिक तनहा नहीं छोडती..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Thursday, June 29, 2017

..सगळंच उध्वस्त..! :-)


♥ क्षण..! ♥

..सगळंच उध्वस्त..! :)

प्रत्यक्षात तुझा आणि शब्दांमधल्या तुझा ॲटिट्युड फार वेगळा आहे. हे तुला माहिती होते का?..

हो.. मी आखून ठेवलेल्या या चौकटीची मला पूर्ण कल्पना आहे..!

कसं मेंटेन करतोस?.. प्रत्यक्षातील नाही. पण शब्दातील तुझा ॲटिट्युड लवकर लक्षात येतो!..

'छाप पडली पाहिजे', 'इम्प्रेशन स्ट्रोन्ग पाहिजे' या वाक्यांच्या विरुद्ध वागायचं. हवं तर प्रवाहाविरुद्ध जगायचं. सहज येतं. जमतं. कळत..!

..पण हा ॲटिट्युड हानिकारक आहे असं नाही वाटत का तुला?..

नाही. हा ॲटिट्युड आहे म्हणून दहा वेळा विचार करुन माणसे वाचतात. व्यक्त व्हायचं धाडस करतात..!

उगाच नाही का पण हे?.. कशाला माणसांना दबावात ठेवायचं?.. घाबरतात लोकं तुला. तुझ्यापेक्षा तुझ्या शब्दांना!..

काही कोणी घाबरत बिबरत नाही. मर्यादेची जाणीव होऊन लोकं त्यांच्या चौकटीत गप्प राहतात..!

..एवढा रुबाब आणि बेरकीपणा शोभत नाही पण!..

रुबाब आणि बेरकीपणा माझ्या शब्दांची आभूषणे आहेत. म्हणून वेगळेपणा वखानतात लोकं..!

..तरीपण...

कसय ना लहानपणी मुलांवर संस्कार केले जातात. तेव्हा ती मुलं संस्कारी वाटतात आणि असतातही. माझ्या शब्दांवर मला देखील न जुमानण्याचे संस्कार आहेत. ते काय कुणाच्या '.B.E.E.P.' ऐकतील..?

वळण लावावं मग आपण!..

प्रवाहाला वळण नाही बांध घालावा लागतो. ही शब्द तर वादळे आहेत. थोपवायची म्हटलं तर...

..सगळंच उध्वस्त..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
73879 22843

Tuesday, June 13, 2017

वा-जा..! :-)



♥ क्षण..! ♥

वा-जा..! :-)

..तुमच्या प्रोफाईल स्टेट्स अथवा पेज स्टेट्स पोस्ट वर.. नेमकं काय चालतंय हे समजण्यातच जास्त वेळ जातो..
- वाचक-जाचक

..माणसाने धडपड कशाला करायची मग एवढी.. जगण्यासाठी होते तेवढी पुरे.. अवांतर.. उगाच का म्हणून..?
- मी

..तुला नाही कळायचं..विचारुपण नकोस..
- वाचक-जाचक

..राहिलं..! :-)
- मी

..ए..
- वा-जा

..काय..?
- मी

..काही नाही..
- वा-जा

..बरं..! :)
- मी

.. Typing... Stop typing... Typing... Stop typing... Typing... Stop typing...
- वा-जा
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३
#चुकूनओपनझालेलीचॅटविन्डो

Monday, June 12, 2017

भिजू.. एकदा..? :-)


♥ क्षण..! ♥

भिजू.. एकदा..? :)

सर्दी-पडस होईल म्हणून पावसाला मी वाळीत टाकलं.. तू सांगितलंस म्हणून हां.. अन्यथा ऐकलं मी कोणाच्या.. ओ लेखक भाषा!.. वाक्य म्हणून अर्धवट सोडलंय.. आभाळालाच सासरे म्हणायची चुकी करु नका.. त्याची वीज झेपायची नाही आपणास.. आभाळ भरून यायला लागलं तसं.. अंगणात जाडजूड लोखंडी ठोकळा ठेवायच्या तुम्ही.. का तर वीज घाबरते म्हणून.. की रात्री येणाऱ्या चोराला बदडून काढायला म्हणून.. एकदा काय बऱ्याचदा तर मीच आपटलोय त्या ठोकळ्याला ठेचाळून..
..आणि तुम्ही वर्दी घेता.. पावसापाण्याची पुन्हा ढोसून आलात..? अंधार.. नसलेली वीज.. थेंबांचं टोचणं.. वर वाढलेल्या गवताळ चिखलात रुतलेले पाय.. त्या पायातल्या पायतानाला किलोभर चिखल.. आणि त्यात तुझा आडवा ठोकळा.. आणि.. ढोसली मी.. पुरे.. छत्री असूनही पूर्ण कसे भिजून येता काय समजत नाही का मला?.. विषयांतर नको.. पाऊस आणि ठोकळा भिजण्याचा काय प्रबंध.. संबंध..?
आवरा.. सुका आता.. हा घ्या टॉवेल.. तेल तापलंय मला भजी तळायची आहेत.. तुम्हाला काय.. दुसरीकडे कॉफीचंपण आंधन ठेवून द्या.. आम्हाला एवढंच..! दारातला पाऊस, खिडकीतला पाऊस, छपरावर-बाल्कनीत, धावपळीत आणि शेवटी आठवणीतला पाऊस.. गार झालेली कॉफी.. थंड झालेली भजी.. शांत एकांतात खायला उठणारं रिकामं घर.. माणसांशीवाय..  कितीतरी स्मशानातल्या प्रेतांवर भर पावसात घट्ट चिखलात विरघळत जाणारी माती.. आणि या सगळ्यात गुलमोहराच मोहरणं साठवायचं, पानगळ सावरायची की, वठणं..? मला हे पटत नाही.. पुन्हा भिजू.. एकदा..? परत... ... ... ??
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Thursday, May 25, 2017

#पाळी..! :)


♥ क्षण..! ♥

#पाळी..!

ती : जो तो #पाळीवर लिहितोय तू पण लिही ना काहीतरी..?

मी : हाहाहा, झेपलं तर बघ..!

"नैसर्गिक काय सर्वदृष्ट्या सुदृढ असलेला प्रत्येक समाज आहे. या समाजाचा वासनेने हापापलेला वांझोटपणा त्याने त्यागल्यावर; त्याची स्त्रीला उपभोगण्याची लालसा जेव्हा कपड्यांच्या आतील सौंदर्य बघण्यात गुंतलेली असेल. तेव्हा त्याची मानसिक पाळी निसर्ग निर्मित आणि नियमित यायला लागेल. त्यावेळी त्या समाजासमोर फक्त आरसा धर...
..आणि सांग विवस्त्र (नागडं) दोघेही होऊ शकतो. अब्रुनुकसानीचे खापर आणि ओझं मला पेलून मिरवावं लागेल. अवघडल्या जागेचं कायमचं दुखणं होऊन बसेल. पण! नवनिर्मितीच्या या सुखद चक्राचे पाईक या समाजाला होता येणार नाही. याची एवढीच काय ती लाज मला माझ्या पदरात लपवलेल्या तोंडाला वाटते. बाकी तुम्ही आणि तुमच्या सामाजिक आस्था या समाज व्यवस्थेत बाटलेल्या आहेतच!
या अशा समाजात मला समरस व्हायचं नाही. वैचारिक कृतिशून्य समाज मला नकोय. कृतिशील निष्ठावान समाज मला हवाय आणि तो नसला तरी तो घडवणारा पुढचा अंश मलाच घरंदाज निपजायचा आहे. या गर्भधारणेसाठी मला शय्या करण्याची गरज नाही. माझे पतन झाल्यावरही सतत माझ्या शरीराचे स्वतःच्या वीर्यपतानासाठी तोडले जाणारे लचके खाणे बंद करा. शक्य झालेच तर आणखी एक "भूक आहे म्हणून अधाशासारखं खायचं नसतं." चव-चटक लागल्यावर म्हटलेलं नाही स्वीकारायचं असतं. हे स्वीकारणं शक्य नसेल तर तरुण अवस्थेत स्वतःच्या हातांचा आपण उपयोग केलेलाच आहे तो सातत्याने चालू ठेवावा..!"
(दिवस आणि रात्र #पाळीत)
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+91 73879 22843

Sunday, May 14, 2017

मातृश्री..! :-)


♥ क्षण..! ♥

मातृश्री..!

मातृश्री : काय मग मृदुंगा काय म्हणतात तुझे वाचक?
मी : कुठे काय काहीच नाही..!
मातृश्री : पत्र मग बरीच लांबलचक येतात त्यावर काय म्हणणं आहे तुझं?
मी : आई! तू वाचलेली आहेत ती पत्र आणि मी पाठवलेलं उत्तरही..!
मातृश्री : म्हणूनच विचारतेय ना कारट्या हे जे करुन ठेवलं आहेस ते आता बंद करु नकोस.
मी : वाचक शाश्वत नसतात आई. आज मला पत्र पाठवतात उद्या आणखी कुणाला पाठवतील. क्षणभराचा मोह आहे हा आणखी काही नाही..!
मातृश्री : अय, लेखकीय भाषेत माझ्याशी बोलायचं नाही कळलं?
मी : ते जाऊ दे आणखी काही सुधारणा असतील तर सांग..!
मातृश्री : काय सांगू? काही नवीन लिहायला घे! तुझ्या चाहत्यांना तेवढंच हवंय.
मी : सांग ना मग काय लिहायला घेऊ..?
मातृश्री : अर्धवट राहिलेल्या त्या कथेला पूर्ण करण्यापासून सुरुवात कर.
मी : अगं ती अर्धवट कथा तेवढीच चांगली वाटते. प्रत्येक कथेला शेवट असावाच असा कुठे नियम आहे..?
मातृश्री : तुला आलेल्या बऱ्याच पत्रांमध्ये त्याच अर्धवट कथेचा उल्लेख आहे. वाचकांच्या इच्छेला मारु नकोस पूर्ण कर.
मी : अगं पण...
मातृश्री : पण बिन काही नाही. पूर्ण म्हणजे पूर्ण कर.
मी : ठीक आहे सवड काढून करतो पूर्ण..!
मातृश्री : आणि जे डायरीत कुजत ठेवलं आहेस त्याचपण काही करा लेखक महाशय.
मी : डायरीतलं ते तुझ्यासाठी त्याच झालं काय व्हायचं ते..!
मातृश्री : असं का मग रद्दीत देऊन टाकू?
मी : तुझी इच्छा! :)
मातृश्री : बरं! टिश्यू पेपरवर लोकांना महत्त्वाचा मजकूर आठवणीने लिहून देण्याची कशी बुद्धी सुचली तुला?
मी : टिश्यू पेपर एवढा नाजूक पेपर दुसरा कोणता सापडला नाही. त्यात लोकांचं मन पण तसंच कोवळं हलकं-फुलकं असतंय ना..!
मातृश्री : काय कारणे देतोस ना एक एक! हो बाजूला.
मी : कारणे कुठे..? उत्तर दिलं मी..!
मातृश्री : (डोळे वटारून) मला शिकवशील
मी (मनातल्या मनात) : आळी मिळी गुप चिळी. मी चाललो बाहेर..!
मातृश्री : तळ्याकाठी जाऊन आताच संवाद लिहून पोस्ट कर..!
मी : तुला कसं कळत..?
मातृश्री : आई आहे तुझी ^_^
मी : काही बोलायलाच नको..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३