क्षण..!
माहित आहे..! / वाटलेच होते..!
काही प्रश्न कुणाला विचारण्या आधी, त्या प्रश्नाचे उत्तर कुणाकडून अपेक्षीत असते तेच मिळते. तेव्हा 'माहित आहे / वाटलेच होते' म्हणाल्यावर एकमेकांत गुंतल्याची जाणीव होणे आणि काळजीचे स्वरुप शब्दात हुबेहूब व्यक्त होणे, यांची पराकाष्ठा एकत्र करुन काही असते तर ते एक 'नातं' असते.
नात्यांची रित, पत वेग-वेगळी का असे ना. मनात त्या नात्याचे पवित्र अस्तित्व एक सारखेच असते. तिथे सिमा नसतात, बंधणे नसतात अन् गाठी ही नसतात. धाग्यांच टोक सोडून धाग्याचा एक मोठा पल्ला अथवा पदर पापण्यात पकडून ओलावा असलेला काठ किंवा किनारा येव्हढाच नात्यांचा पसारा असतो..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:
Post a Comment