Powered By Blogger

Saturday, February 20, 2016

दळभद्री कर्ण..! :-)


♥ क्षण..! ♥

दळभद्री कर्ण..!

काही कारण नसतांना कवच-कुंडले दिल्यानंतरचा दळभद्री कर्ण समोर उभा राहतो. अर्थात दळभद्री ही उपमा रास्त असली तरी न रुचणारी आहे पण तेवढीच वास्तवसुद्धा आहे! दळभद्रीच का? दानशूर कर्ण म्हणून आख्यायिका असतांना दळभद्री कशाला बरं आठवावा? ज्याचा जन्मजात प्रारबद्ध थोर! असं असतांनाही संपूर्ण जीवनाचा अर्थ स्वतःच्या सामर्थ्यावर कमवून, उपकार केल्यासारखं आयुष्यही ओवाळून किंवा स्वतःला संपवून टाकणं निश्चित करणं; यात समाधान कसलं मिळालं दळभद्री कर्णाला?
मुलगा म्हणून, राजा म्हणून, मित्र म्हणून किंवा वरदान म्हणून मिळालेल्या आयुष्याचा त्याग स्वतःच्या दानशूर वृत्तीने करुन महान होऊन तृप्त आणि मुक्त होता कसं आलं? जितेपणी कोणी पाणी पाजलं नाही. रणांगणावर वीरमरण घेतांना सुस्कारे अनेक सुटले पण रक्ताशी बांधलेल्या नात्यांवरचे बांध तुटले नाहीत. धर्माच्या विरोधात असलेलं प्रत्येक नात अधर्मच असतं तर साम, दाम, दंड आणि भेद यांचा वापरही तर धर्माच्या स्थापनेसाठी केला गेलाय.
कर्ण म्हणून आयुष्य त्यागतांना, आत्म्याच्या चितेवर आतल्याआत जळत असतांना दानी म्हणून मागितलेल्या अक्षम्य गुन्ह्यालाही उदार मनाने माफ करुन कर्ण हा दळभद्रीच ठरतो! अंगी कसब, भाळी जन्मजात प्रारब्ध त्या जगत पित्याकडून उचलून आणतांना कर्तव्याच आणि जबाबदारीच सामर्थ्य पेलण्याचं ओझं कमी नव्हतं! तरीही प्रत्येक श्वासावर दुर्गंधीने माखलेले आभूषणे नजर केली गेली. जन्मास येण्याची लक्तरे दिली गेलीत. तरीही युद्धात जिंकणारा अर्जूनच घडवला परमार्थ्याने हरलेला दळभद्री कर्ण पुन्हा घडवलाही पण तो तसाच निष्कपट, निस्वार्थ, निश्चयी आणि दानीच निपजला यात स्वार्थशून्य असण्याचे आणि दळभद्री कर्ण असण्याचे दोष कुणावर लादायचे? परमपिता परमेश्वरावर की, दृढ निश्चयी आणि प्रवाहाविरुद्ध असलेल्या दळभद्री कर्णावर..?
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Tuesday, February 16, 2016

नजर..! :-)


♥ क्षण..! ♥

नजर..!

काळोख असला तरी कुठेतरी एका बिंदूवर नजर खिळली असते. कधी मनात झाल्या-गेल्याचा हिशेब लागत असतो तर कधी काळोखाला नजरेने क्षणभराचा उजेड मागत असतो. मिळत काहीच नसत,गमवायला अजून काय उरलेले आहे याचाच ताळमेळ साधला जातो. कधी अधीर होतं मन अन् कधी हळवही होतं. एखादा विषय काढून थोडंस हसणंही उगाच होतं. काळोखाला स्वीकारलं जातं, प्रकाशाला नाकारलं जातं. भूतकाळासह स्वतःला दोषी ठरवलं जातं.
काळोख असतो तसाच! तरी डोळ्यात धुकं दाटत जातं. कधी ओढ लागते, कधी जीवावर येत राहतं. आयुष्याच राहाट गाडं पुढे ढकलत नेतं. नजरेसमोर अंधारातले खेळ चालतात. सोबत असलेले सवंगडी फक्त मज्जा पाहतात. कधी काजळ पसरतं अन् नात्यांची वीण विस्कटते. नजरेसमोर असलेलं अस्तित्व काळकुट्ट बिंदू होऊन नजरेतच रुतत जातं. कारण नजरवेध घेण्यासाठी असलेली सगळी लुभावणारी सोहळे फक्त नजरकैद होत असतात. नजर कुठे पोहोचत नाही. अंतरंग उलगडत नाही. म्हणून प्रश्न असतात नजरेत पण उत्तरं मुक्या नजरेतून कळत नाही..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Friday, February 12, 2016

लाईट्स, कॅमेरा,sssऍक्शन..! :-)


♥ क्षण..! ♥

लाईट्स, कॅमेरा,sssऍक्शन..!

मोजून १२ शब्द अर्थात एक ते दीड ओळ कागदावरची.. काही मिनिटात कागदावर लिहिली गेलेली.. काही सेकंदात ज्याच्यासाठी लिहिली होती त्याने वाचली काय.. व्हिडिओ शूटसाठी सेटअप उभारला.. तो ही स्पेशल.. का..? तर हेच पाहिजे.. असच पाहिजे.. घे.. जेवढं घेता येत तेवढं.. तसच्या तसं उमटवायला सगळं बळ एकवटावं लागतं.. दमलास की कळेल तुला.. थोडंस जगायला किती मरावं लागतं.. एकेका शब्दाला कॅमेरात कैद करुन कधी-कधी फक्त हसावं लागतं.. लाईट्स, कॅमेरा आणि ऍक्शन म्हणून संवाद सुरु करण्या आधी असलेलं मौन हाही एक अभिनय, डायलॉग आणि लिहिला गेलेला एक क्षण आहे..!✍🏻
--------------------------- मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Friday, February 5, 2016

मला वेळ नाही..! :-)


♥ क्षण..! ♥

मला वेळ नाही..!

वेळ कधीच नसतो...वेळ काढावा लागतो... हे आपल्यावर असतं... आपण वेळ काढावा की, न काढावा... कारण वेळ द्यायची आहे म्हटल्यावर... ती वेळ निभवावी लागते... त्यावेळेला सांभाळून घ्यावं लागतं आणि ती वेळ आठवण म्हणून लक्षात ठेवावी लागते... उत्तरार्धात नजरेसमोर खोडकरतेने बागडणारा क्षण येऊन जातो... तेव्हा... ती वेळ खूप सुखात गेली याची जाणीव होते... वेळ नाही हे कारण झालं... वेळ द्यायची नाही हे टाळणं झालं... वेळ देणं हे आश्वासन झालं आणि वेळ काढणं हे वास्तवाचं सुंदर चित्र स्वतः रेखाटणे झालं... वेळेचं महत्त्व अवश्य जोपासावे पण महत्त्व जोपासतांना काही निसटतं आहे का? एकदा बघून घ्यावं... त्यानंतर केलेलं वेळेचं नियोजन कुणाच्या सवडीने आपलं वेळापत्रक बिघडत नाही आणि आपल्या ठरलेल्या शेड्युलवर परिणाम होत नाही... थोडा वेळ देण्या-घेण्यापेक्षा काढून बघायचा... जमतं! बराच वेळ मिळून पूर्ण वेळ दिल्याचं समाधानसुद्धा मिळतं....
ज्याच्यासोबत आपल्याला हसता येतं, त्याच्यासोबत पूर्ण दिवस काढता येतो, पण
ज्याच्या जवळ आपल्याला रडता येतं, त्याच्यासोबत मात्र पूर्ण आयुष्य जगता येतं..!
---------------------------- मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Thursday, February 4, 2016

तिसरी ओळ..! :-)


♥ क्षण..! ♥

तिसरी ओळ..!

एका माणसाने नाव विचारल्यावर
दुसऱ्या माणसाने नाव सांगितल्यानंतर
तिसरी ओळ ही जातीची असते. कुठल्या जातीचा याची गृहीतके बुद्धी तर्क लाऊन अंदाजे ठरवते आणि कृती ही जातीचाच मागोवा घेते. कारण एकत्र राहण्यापेक्षा स्वतंत्र बेट तयार करुन राहण्याची मराठी अस्मिततेची वृत्ती आणि प्रवृत्ती आहे. तिचे प्रदर्शन घोष आणि स्फुरण देणाऱ्या वाक्यांत करण्यापेक्षा स्वतःच्या स्वाभिमानात कर्तृत्वाची मराठी रुजवली की रक्त थंड पडत नाही, ते उसळत राहतं. त्या उसळणाऱ्या रक्तातून मराठी अस्मिततेचा सन्मानाने व ताठ मानेने ओसंडून वाहणारा प्रवाह पहिला की, प्रत्येक नजरेला मुजरा करावाच लागतो! तेव्हा मराठी बाणा वक्तव्यात ठेवावा की, वृत्तीत हे मराठी मातीचे वक्तव्यात तीर्थ पिणारे भक्तच ठरवतील..!
---------------------------- मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Monday, February 1, 2016

आर्त आयुष्याचा निसर्ग..! :-)


♥क्षण..! ♥

आर्त आयुष्याचा निसर्ग..!

छातीत दाटलेला उर आणि मनात माजलेले काहूर ही डोळ्यांची दारं अश्रूंसाठी उघडी करतात. गालावर ओघळलेल्या थेंबांना हातांनी पुसून आठवणींची उघडी दारं बंद केली जातात. प्रत्येकाच्या आयुष्याची खोली अशीच असते. जिथे काही माणसे धर्मशाळेसारखी राहतात तर काही माणसे घर असल्यासारखी वागतात. सरतेशेवटी घरासमोरचे स्वप्नांचे आंगण हे रिकामेच होत असते. उरतात ते वयोवृद्ध होत आलेली श्वासांची झाडे! ज्यांची मुळे मनाच्या जमिनीत खोलवर रुजली की, स्वतःच्या चरितार्थासाठी कडवे पाणी पितात आणि परिस्थितीच्या कुऱ्हाडीची घावं हसत हसत आपल्याच खोडावर झेलायला तयार होतात कारण देत राहायचं हा त्यांचा स्वभाव धर्म असतो. त्यामुळे आनंदाने सजलेला आयुष्याचा बगिचा हा सुनासुनाच वाटू लागतो..!
--------------------------- मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३