Powered By Blogger

Thursday, December 28, 2017

ऋतू.. बहरता बहरलेला..! (कथा भाग-२)



♥ क्षण..! ♥

ऋतू..
बहरता बहरलेला..!
(कथा भाग-२)

..नुकताच पाऊस येऊन गेला. अर्थात तो पाहुणा आल्यागत वागलासुद्धा.
..मी म्हटलसुद्धा त्याला हे असं उभ्या उभ्या येऊन जाणं शोभत नाही.
..त्याच उत्तर म्हणजे आभाळात गडगडणं. वेंधळ्या वाऱ्याने गारठा लपेटून संपूर्ण शरीराला अल्हादाने अच्छादण.
..एकतर पाऊस वेळ सांभाळत नाही. निसटत्या थेंबांवरचा निरोप वाचत नाही.
..आरोप करायचे म्हटलें की, हा खुशाल दडी मारुन पसार.
..मग स्वतःच मन हलकं करायचं तरी कुठे? आणि कुणाकडे?
..मतलबाच्या या युगात सभ्यतेचे औदार्य दाखवतांना निसर्गही बेशिस्त वागतो.
तेव्हा माणसांची खुशामत करायला आणि खुशाली विचारायला वेळ कुणाकडे असतो?
..आल्यापाऊली माघारी फिरायची एक रीत झालेली आहे. या रितीच भाग्य असं की, प्रतिष्ठित असणं कर्तब झुगारण्यात सामावलेलं आहे.
कॅलेंडरच्या पानांवर कितीतरी वर्षे उलटून गेलेली आहेत. आताही एक वर्ष अगदी सहज उलटण्यात आलं आहे. दिवसांचा खेळ अवघ्या तासांच्या हिशेबावर येऊन ठेपला आहे. यात काही बदललेलं आहे. तर ते म्हणजे पूर्वीसारखा उत्साह आणि आनंद उरलेलाच नाही.  बेत आखायचे म्हटले की, कितीतरी रेषा कधीच खोडल्या गेलेल्या आढळत असतील. यांचा हिशेब लावता-लावता पुन्हा ओरखडे पडतीलच.

..जाऊ द्या. कसंय ना काही केलं तरी त्याला अर्थ नाही.
..काही वेगळं असं केलं नाही तरीही ते अर्थहीनच गृहीत धरलं गेलंय.
..त्यापेक्षा नकोच या नुसत्या उठाठेवी.
सामान्य दिवसासारखाच एक दिवस समजून घ्यायचा आणि पुढे चालत यायचं.
..मागे नजर गेलीच तर फिरलेली तोंड आणि बदललेल्या वाटांनी स्वतःची विषन्न अवस्था करुन घ्यायची.
..या हतबलतेशिवाय आपल्याला अजून काहीएक चांगलं अजूनतरी जमलं नाही.
मग कशाला ना पुन्हा अपेक्षांच्या झुल्यांना झुलवायच?
..सुंदर आयुष्याची फुलवलेली अख्खी बाग डोळ्यादेखत स्वतः आपणच जाळून टाकल्यावर स्वप्नांना गांभीर्य कशाचे आणि का वाटणार?
..जगण्याची तात्पर्य शोधण्यात आपला वेळ तसाही कसा निघून जातो? हे कळत नसल्यावर आणखीन काही आहे वेगळं या जगण्यात. हे सापडत कुठे? कळतं तरी केव्हा?
..तुला कळणार नाही, म्हणत आता माझं मलाच काही एक कळेनासं झालेलं आहे.
..तुला सगळं सांगायचं. मन व्यक्त करुन अबोल होयचं. हे आता फारसं सहज जमत नाही. माझ्याव्यतिरिक्त कुणाला फारसा मी समजत देखील नाही.
..मग अख्ख जग माझ्या विरोधात जाऊन बसले तरी मला त्याची पर्वा नसतेच.
..चौकटीच्या मर्यादेतून काही गोष्टी पाहिल्या की, सगळं व्यवस्थित वाटत असतं. याच गोष्टींना प्रेमाच्या भिंगातून पाहिलेस की, समजतं! सूर्याची किरणे हृदयावर एकवटून आग केव्हाच लागून गेलेली आहे.
..अंधारात आणि आधारात उठाठेवींचा एवढाच फरक असतो.
..त्यामुळे या नुसत्या उठाठेवी आता बंद.
..बंद म्हणजे बंदच!
(क्रमशः)..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३
(कथेचे संपूर्ण वृत्तांत काल्पनिक असून त्याचा कुठल्याही जीव, जंतू, प्राणी व धर्माशी काही एक संबंध नाही. जर काही संबंध आढळलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा.)

Tuesday, December 26, 2017

उरतं..! :-)


♥ क्षण..! ♥

उरतं..!

घर आपलंच असतं न्
भिंती परक्या वाटतात,
अंतर क्षितिजा एवढंच
वाटा थोडक्या दिसतात..
कदाचित, असं नसेलही
तरीही सारं धूसर वाटतं,
भरल्या घरात कोण जाणे
कसं काय? पण दूध फाटतं..


अंतर कमी करता-करता
अजून अंतरे मैलांची होतात,
थोडं मागे चालत यावं तर
सर्वी दारं बंद झाली असतात..
मन लागतं, गुंतवून ठेवलं जातं
आतल्याआत त्याचं तुटण लपतं,
सांगणार कुणाला? सगळ्यांना?
त्यांना तर सगळंच कळतं-समजतं,
मला सांग आता बाकी काय उरतं..?
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Sunday, December 24, 2017

उपरा..! :-)



♥ क्षण..! ♥

उपरा..!

अर्ध्या रात्री मग
दचकून उठायचं,
भलं-बुरं-चुकलं
सगळं आठवायचं..

स्वप्नांचे अन् क्षणांचे
आमिष देत रहायचं,
या कुशीवरून त्या
कुशीवर वळत रहायचं..

नकळत स्पर्श झालेच
संबंध विसरुन जायचं,
अलिप्त न् षंढ होऊन
स्वतःला सावरुन घ्यायचं..

घर कदाचित आपलंच
परकं परकं वागायचं,
उपराच आहेस तू तर
उपराच होऊन जगायचं..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Thursday, December 21, 2017

ऋतू.. बहरता बहरलेला..! (कथा भाग-१)


 क्षण..! 
ऋतू..
बहरता बहरलेला..!
(कथा भाग-१)
प्रत्येक गोष्टीची सुरुवात पावसापासून होते. तशीच पावसापासून प्रेमाची सुरुवात होते. आपण मात्र उगाच अंतर ठेवतो. हा योग की, योगायोग या संभ्रमात कर्म करत राहतो. कितीतरी पावसाळे सरुन गेले असतील. पावसाचा आणि कुणाचा प्रेमळ योगायोग जुळून आलेला नसेलच. मनात एक असतं. ओठांवर अनेक असतं. पावसासोबत ओघळलेलं तारुण्य नवं असतं, हवं असतं. स्वप्नच असतं हेही एक. वास्तवात उतरत नाही तोवर भाकड कल्पनेत रमले असते. वास्तवाची जाणिव करुन द्यायची म्हटलं की, सगळंच पुन्हा आलबेल करुन जाणारं सत्य असतं.
..चौफेर चोखंदळ जगायचं तरीही असतं.
..आपलं आयुष्य आपण सावरायच असतं.
..दूषणं भले मग कितीही लागोत, हृदयावर आघातांची आभूषण मिरवत जगायचं असतं.
रोज हृदयाची आहुती देणारे वेगळे नसतात. स्वप्नांची चिता पेटवून हात शेकणारे आपलेच असतात. कालांतराने हसण्यावर उडालेल्या गोष्टींपैकी एक गोष्ट प्रेमाचीही असते. सांगायची म्हटलं की, दातखिळी बसते. जगायची म्हटलं की, जीवावर येते. सोडून द्यायची म्हणताच, पुन्हा नव्याने गोष्ट रंगू लागते. करायचं काय? उगाच काय? म्हणत एक गोष्ट बनते. तिला फोडणी, खतपाणी आणि आहुतीही नियतीची खेळी टाकत राहते. अशावेळी आपण हतबल होण्याव्यतिरिक्त काहीएक करु शकत नसतो. शिवाय पुढे अख्ख आयुष्य पडलंय म्हणत निव्वळ चालढकल करत राहतो. पश्चातापच्या यज्ञात स्वतःचा बळी देऊन थोर पुण्य कमावलं या अविर्भावात जगत राहतो.
..चुकलं कुणाचं? कधी? कशामुळे? सतत शोध घेत राहतो.
..काही उत्तरे एखादवेळी सापडतातसुद्धा. पण प्रश्न अर्थहीन झालेली असतात.
..कळलं कसं नाही तेव्हा? उत्तरच असतं एक स्वतःला दिलेलं. पण जाब स्वतःचीच बुद्धी मागते.
..गोंधळ अजून किती होणार? झालेला गुंता सोडवता-सोडवता जरा जास्तच गुंतत जातो. आपण!
..पण काही म्हणा, आठवलं ते सगळं की मोरपीस फिरतोच आणि एक सल मनात खोल रुतते.
..वेदनेच्या अथांग सागरात एकटेपणाचे मनोरे हेलकावे खात असतांना; गुन्हेगार दोष स्वतःला देतात. शिक्षा जग ठरवून देत असते.
भोग उपभोगण्याची मनाची संपूर्ण तयारी झाली असतेच की, तेवढ्यात..
..तेवढ्यात, ऋतू बदलण्याचा नियम अचूक पाळून घेतो..
..बाहेर रिपरिप पावसाला सुरुवात होते. धरणीचा दाह एका क्षणात सुगंध होऊन दरवळू लागतो.
..भर पावसात अश्रू लपविण्याची आयती संधी दडवता येत नसते.
..क्षणभराचा मोह सर्वस्व लुबाडून घेतो. पदरात उरते ते स्वतःच्याच ओंजळभर स्वप्नांचे दारिद्र्य.
..स्वतःच अनाकलनीय गूढ वास्तव.
(क्रमशः)..!
------------------------  मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३
(कथेचे संपूर्ण वृत्तांत काल्पनिक असून त्याचा कुठल्याही जीव, जंतू, प्राणी व धर्माशी काही एक संबंध नाही. जर काही संबंध आढळलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा.)

Friday, December 15, 2017

याद पिया की... :-)


♥ क्षण..! ♥

याद पिया की..!

कुछ इस तरह से
अब...
रात गुजर रहीं है..
जहाँ...
हर समा मधहोश है..
वहाँ...
वो बहोत खामोश है..
शायद...
बिती बातों का असर है...

अनकही...
अनसुनी एक कहानी है...
इश्क...
कहो या दर्द-ए-नादानी है...
उसने...
चंद पन्नो को पलट दिया है...
वहीं...
उस नज्'म ने दिल छु लिया है..!

(याद पिया की आsssएss..)
https://youtu.be/YdRsN4_BPS8
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Saturday, December 9, 2017

मापदंड..! :-)



♥ क्षण..! ♥

मापदंड..!

मी तुझ्या स्वभावाचे..
कोणते खरे मानू तत्व?
गालबोट मग कसलं लावावं?
ओटीत आणखी काय द्यावं.?
तू वठवलेल्या भूमिकेला
प्रमाण आहे तुझं अस्तित्व..

प्रतिष्ठीतांच्या षंढ मर्यादेत
काळ्या मण्यांचीच साखळदंड..
राजरोस अंगलट वेढे नजरांचे
देहाची शय्या मात्र गात्रांचा भुर्दंड..
वांझ झालेल्या चौकटीत अन्
बाजारबसव्यात लाचार मापदंड..?
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Thursday, November 30, 2017

लाजाळू..! :-)


♥ क्षण..! ♥

लाजाळू..!

..त्या दिवशी लाजाळूने अखेरची पाने मिटली. कुठल्या एखाद्या पानावर अखेरचं प्रबोधन असेल, म्हणून माझं कुतूहल शिगेला पोहोचलं होतं. राहून-राहून मन त्याची पानं कुरवाळत होतं. मिटलेली पाने कदाचित कुरवाळून पुन्हा उघडतील म्हणून.. कुरवाळल्यावर पाने मिटणारा तो. त्याने त्याचा गुणधर्म काही सोडला नाही. शेवटी काय? मातीला पुन्हा मूठमाती देऊन कर्तव्य पार पडायचं. आपला शोक शोकांतिका होताच संपतो. मग ही मिमांस कुणाला सांगत फिरायची? ठेवायचं आपलं स्वतःलाच. जाणारा सांगून जात नाही आणि येणारा पूर्वकल्पना देत नाही. आलिया भोगासीमध्ये मतलबं बाजूला राहतात. तेवढ्यापुरता चालढकल होऊन जाते. थोड्या दिवसांनंतर सगळं स्थिर होतं. माती झालेल्या कितीतरी प्रेतांच्या स्मरणार्थ; पहाटे प्राजक्त स्वतःला मातीवर उधळून देत असावा अशी संकल्पना होते. याची प्रचिती यायला, तेवढं पुण्य आपल्या वाट्यात आहे का? मग पुन्हा एक लाजाळू त्याच मातीवर पुन्हा रोवला. सवड काढून अगदी एकेका पानासह सतावला. लाजाळू पानं मिटतांना दिसला कित्येकवेळा. पानं उलघडतांना मात्र नेमकी आपली पापणी मिटून जायची. फारसा दिसायचाच नाही. प्रत्येकाच्या भूतकाळाची अशीच लाजाळूची मिटलेली पाने दिसतात. पण ती पाने उलघडलेली दिसत नसतात. गुंतलेली असतात. त्यामुळे मग म्हटलं लाजाळूची मिटलेली आणि आपली दुमडलेली पाने बरी..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Monday, November 27, 2017

पाहिला का तू..? :-)


♥ क्षण..! ♥

पाहिला का तू..?

मर्म जाणिला का तू?
कर्ण पाहिला का तू?
नयन शाबूत तुझे ना
कृष्ण पाहिला का तू?

दाह साहिला का तू?
राम दाविला का तू?
नाम स्मरणात कधी
राधा गायिला का तू?

मुखी आणिला का तू?
कर्म त्यागिला का तू?
गात आर्त अभंग मीरा
श्याम पाहिला का तू?..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Wednesday, November 8, 2017

जोगण..! :-)


कितीतरी रात्रींवर रेष
अन् अंगभर लवलेश,
धुंद म्हणावे मी कोणा?
मज डसला असा शेष,
सोडून दिला एकदा देश
बदलला कित्येकदा वेष,
ओघळलो सिंहकटेवरी
अन् नाभीतच राहिली वेश,
मज ना झाली ही लागण
ना मी बनलो बोथट दाभन,
पाळली मर्यादा मी माझी
परी मोहावली ही जोगण..!
------------------------  मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३
( Painting : The Silent Princess _ by_ Garry Samunjan )

Friday, October 27, 2017

मोठं होत असतांना... :)


मोठं होत असतांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे?
तुम्ही कितीही समजदार असलात ना! तरी होणाऱ्या किंवा घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी स्वतः जबाबदार राहत असता. तुमच्या कडून झालेल्या चुकांना किंवा घटनांना इतर कुणावरही तुम्ही लादून मोकळं होऊ शकत नाही. म्हणून मग स्वतःच स्वतःला सांभाळत राहावं लागतं. सतत होणाऱ्या आरोपांचंही असंच असतं हळूहळू तेही मोठे होत असतात. तेव्हा सोडून द्यायचं नसतं. स्विकारुन घ्यायचं. निदान थोडंतरी आयुष्यात मग तुमच्या मनासारखं काहीतरी होईल..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Thursday, October 26, 2017

पप्पा आणि मी (संवाद)

जाता-जाता पप्पांनी विचारलं..
पप्पा- "दिवाळी अंकांसाठी तू का कधीच लिहीत नाहीस?,
लिहीत जा. पाठवत जा."
मी - पप्पा आता तुम्हाला काय सांगायचं या लोकांचं राजकारण?
सगळं करुन भागले. इथेही दिवाळी अंकांची एक वेगळी स्पर्धा आहे.
माझी स्पर्धा अजूनतरी माझ्याशीच आहे. त्यामुळे या लुभावण्या प्रलोभनांवर मला भाळताच येत नाही..
पप्पा - (एकाच नाव घेतलं) ओळखतोस का? त्यांचं आलं छापून.
मी - ते मला ओळखतात. विचारुन बघा!
पप्पा - प्रवाहासोबत चाल एकदा. ऐकला चलो रे म्हणत राहाशील तर कसं होणार तुझं?
मी - काहीच बोललो नाही.. माझा मुंबईचा प्रवास सुरु झाला.
आता थोड्यावेळा पूर्वी पप्पांचा व्हाट्सअप्पवर मॅसेज आलाय..
पप्पा - "गध्या, ही लोकं स्वतःहून तुझ्या मागेमागे येऊन तुला लिखाण मागतात मग देत का नाहीस?"
मी - द्यायला लगेच देता आलंही असतं मला. पण मग विचार केला "मी भांडवल बनावं का?" मी केलेली वाचकांमध्ये गुंतवणूक आहेच माझ्यापाशी. मला त्याच एवढं कौतुक आणि स्पर्धा करण्यासारखही काही नाही. तुम्ही त्यांच्याशी बोलल्यावर कळलं असणार तुम्हालाही मी लिखाण का पुरवलं नाही.
पप्पा - मी समजतो त्यापेक्षा या लोकांना खूप चांगल्याने ओळखून आहेस तू तर..
मी - मिळालं तुम्हला उत्तर. आता झोपतो शुभरात्री..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Tuesday, October 24, 2017

दिसलं पाहिजे..! :-)


♥ क्षण..! ♥

दिसलं पाहिजे..!

..अम्म्म्म्म! लहान मुलांचा निरागस बाळबोधपणा दिसला पाहिजे. तसं म्हटलं तर श्रीमंतांची वैभवता त्यांच्या श्रीमंतीतून व प्रतिष्ठेतून जशी दिसून येते. अगदी तशीच गरीबाची कैवल्य आणि समाधानी वृत्तीसुद्धा दिसून येते. पण आपण बघावं का? हो! लोकांनी त्यांची डोळे तुम्हाला बघण्यासाठीच कार्यशील केलेली असतात. मुलगी बघायला गेलेल्या मंडळींचेच घ्या ना.. पदरात असलेल्या लावण्याचा बांधेसुदपणा जेवढ्या हावरटपणाने दिसून यावा यासाठी धडपड होते. तेवढीच पडद्यामागून संथ, तरल आणि मंजुळ आवाजात उत्तरे देणारी व्यक्तीही जरा अजून पुढे यावी अशी इच्छा होतेच. यात अपवाद अरसिक आणि दृष्टिहीन असूही शकतात. वाईट मुळीच नसेल आणि नसतंही. बघणाऱ्याचा दृष्टिकोन काय आहे हे समजलं पाहिजे. चांगलंच प्रत्येकाला हवं असतं. माझ्यापेक्षाही चांगलं तुला मिळेल किंवा सापडेलही असं ब्रेकअप करणारी प्रेमी युगुल एकमेकांना बोलून मोकळी होऊन जातात. त्यानंतर त्यांना पुन्हा तसं काही दिसतंच असं नसतं. बघायची भूमिका रसिक श्रोत्यांशीवाय आणि दगडाच्या बनविलेल्या विलोभनीय मूर्त्यांशीवाय अजून कुणाला चांगली वठवता आलेली नाही. इथे उपवर मुलगासुद्धा मुलगी बघायला/पाहायला जातो पण ती त्याला योग्यप्रकारे दिसली किंवा त्याने नीटसं पाहिलंच नसते. मग या क्षण दोन क्षणात पसंती देणाऱ्यांना काय साक्षात्कार होतो का? कि, यांच बघणं एवढं सराईत झालंय हेच कळत नाही. कदाचित साठ-सत्तर स्थळे जाऊन बघितल्याने असा अनुभव मिळतो? हे विचार करण्यासारखं आहे..
..तुम्हाला दृष्टी आहे आणि दिसतंसुद्धा चांगलं. एवढं चांगलं दिसतं की उनीदुनि सगळंच चव्हाट्यावर येऊन बोंबाबोंब करते. याला आणखी हातभार म्हणून मग माहिती मिळते. त्या मिळालेल्या माहितीला "समजणं" हा निव्वळ दैवाच्या मनातला सुप्त हेतू कळण्यात सामावलेला एक आनंद! पण दिसलं पाहिजेच! त्याशिवाय कळणार कसं? तोंड फाटकं प्रत्येकाचं असतं. त्यामुळे तोंड उचलून बोलायला आणि विचारायला काही कोणी येत नाही. आजकाल तर "नोटिस केलंय" हे पण ठोकून सांगावं लागतं. त्यात "इग्नोअर केलं" तर झालंच कल्याण!किती शतकं झालीत माहिती नाहीत. देव दिसावा म्हणून आजही पुजला जातोय. कारण तो दिसला पाहिजे म्हणूनच! दिसल्यानंतर काय? तुम्हाला "मोक्ष" कन्फर्म..
तर मुद्दा काय दिसलं पाहिजे. चांगलं-वाईट, सकारात्मकता-नकारात्मकता, गुण-दोष, चुका आणि गुन्हा हे दिसल्यावर मग कुठेतरी दृष्टिकोन बनतो. हा व्यक्तिसापेक्ष असला तरी याचं व्यंजन आणि वेगळं रसायन प्रत्येकाचं व्हेरी स्पेशल असतं. याला सर्वसामान्य "अनुभव" या सोप्या शब्दाने ओळखतात. माझी गृहीतके आणि गणिते या सोप्प्या गुणकारात सापडत नाही. एकमेकांना उगाच म्हणून सुरुवातीला भागायच कालांतराने वजा करायचं आणि आयुष्याच्या टर्निंग पॉइंटला बेरीज करून बाकी सांगायचं? अशी बरोबरीतली गणिते बेहिशेबी नजरांना कळणार कशी? दिसलं-पाहिलं-तोंड फिरवलं मागे मागचं राहून गेलं आणि पुढचं पुढे! काही दिसलं तर दिसलं पाहिजेच! जरा बघत चला! हल्ली सांभाळून राहण्याची गरज आहे. कसलाही गाजावाजा न करता. तेव्हाच दिसणार आपलं आणि दुसरा ढुंकून पाहणार. कारण त्याला इच्छा होणारच! अजून..थोडं अजून "दिसलं पाहिजे..!"
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Thursday, October 19, 2017

दरवळ..! :-)


Wednesday, October 18, 2017

क्षण आनंदाचे..! :-)


Monday, October 9, 2017

तुझी कथा..! :)


♥ क्षण..! ♥

तुझी कथा..! :)

तुझ्या कथेबद्दल मला बोलायचं नाही.. मी वाचलं एकदा नाही हजारदा.. इतकंच कळवणे मला जमले नाही.. तुझ्या कथेनेही मला वाटत चुगली केली नाही.. असो, तुझी कथा चांगली असूनही आवडली अजिबात नाही.. तुझं तू पण त्यात होतं "आपण" नव्हतोच.. त्यामुळे गुंतणे काही झाले नाही.. तुला विणकाम चांगले यायचे म्हणून शब्दांचे गुंफने जमले आहे.. दरम्यान वीण जरा विस्कटलीही... तू सवयीनुसार सारवासारव उत्तम केलीस.. कळणाऱ्याला ते कळलं असणारच म्हणा.. ठीक वाटलं, कथाच म्हणून सोडून दिलं.. तुझ्या कथेत कथानक आणि तुझी कथा कथक फार झालेत.. कदाचित, म्हणून तुझी कथा आत अशी पोहोचत नाही.. अधांतरी वाटते.. पण चालतेय वेगळं काही तरी म्हणून.. मुळात गुंता हवाच सोडवायला.. कोडी सोडवणं सोप्पय, कथेची कोंडी सोडवणं अवघड गेलं असणार.. हरकत नाही, प्रसिद्धीच्या झोताला एकदिवस अंधार ग्रासतोच.. कवाडं तेवढी नजरेची उघडी ठेवून राहा.. या अंधाराला चिरत येणार प्रतिष्ठेचा गंध गर्वाची नवीन कथा लिहून जाणार असतो.. तेव्हा तुझी कथा आणखीन खुलून दरवळेल.. शेवटी मात्र काही राहील तर ती फक्त.."तुझी कथा..!"
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Tuesday, October 3, 2017

चाल-ढकल..! :-)


♥ क्षण..! ♥

चाल-ढकल..! :-)

रात्री उशिराने अंधाराचा आधार घेऊन, पापण्यातून एक थेंब हळूच ओघळतो. कुणाला? स्वतःलासुद्धा नसेल, पण उशीला त्या थेंबाचं कारण आणि महत्त्व माहिती असतं. दिवसासाठी ओढलेला मुखवटा एवढ्या सहज गळून पडल्यावर, अंधाराची जी भीति वाटते ना ती मग इतर कुणाचीही वाटत नाही. अंधार सत्य आणि शाश्वततेची जाणिव करुन देऊ शकतो. दिवस या जाणिवेची उणीव भरुन काढू शकत नसतो. जी चाल-ढकल रोज करतो ना आपण ती याच आयुष्याची. आतल्या आत आणि मनातल्या मनात आपण आणखीन एक वेगळं आयुष्य जगत असतो. जे फक्त आपल्या स्वतःला माहीत असतं. याची वच्यता कुठे चुकून करावी किंवा ओघवती झाली देखील; तरीही आपण ती बंद ओठांच्या ओशाळ हसण्यावर अधांतरी तोलत ठेवत असतो. याचं मूळ कारण स्वतःने स्वीकारलं असतं तर मांडावे लागले नसते आणि स्वतःशीच भांडावे कधीच लागले नसते..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Friday, September 29, 2017

तुला कळणार नाही..! :-)


Thursday, September 28, 2017

मन हे बावरे..!


Wednesday, September 27, 2017

बाधित मृग..! :-)


Monday, September 25, 2017

उधार श्वास..! :-)


Saturday, September 16, 2017

.. सांगायचं म्हटलं तर.. :-)


 क्षण..! 
.. सांगायचं म्हटलं तर.. 
गोष्ट दोन अक्षरांची 'क्ष' 'ण'... एकत्र करुन लिहायचं म्हटलं, आठवण म्हणून जपायचं म्हटलं तर 'क्षण'... सहज, अगदी ठरवून! कायमचं विसरुन जायचं म्हटलं तर 'क्षण'... कधीतरी नकळत पलटावी मागची पाने... ओळी-ओळीवरून फिरावी नजर... शब्द खूप नाजूक आहे म्हणून पानांना सांभाळावित बोटे... शब्दाच्या अंगांगावरुन स्पर्श करतांना जाणवाव... लाजाळूच पान मिटण जेवढं हळवं असतं... एवढंच ते कोवळं वय असतं... तेवढाच निरागस आवेग... तितकाच टोकाचा मत्सर... तसलाच गंभीर आरोप... आणि तोच निष्ठुर 'क्षण'... माझा प्रवास, मी... आणि 'मी' एवढाच असणार कायम 'क्षण'..!
------------------------  मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३


Tuesday, August 8, 2017

बस किजीए..! :-)


बस किजीए..

बस किजीए अब सवाल करना
जो जवाब दे दु तो चुपचाप रहना,
खोमोश-ए-तनहाई शोर मचा दे
बडाही सुमसाम है ये आशियाना..
बस किजीए अब हमे युं टटोलना
हर रास्ते सफर की परख करना,
चलना जिम्मेदारिसे तुम रोजाना
अश्क-ए-इश्क का दस्तूर है बहना..
बस किजीए अब और नहीं कहना
ना हीं कुछ और है किसींसे सूनना,
हम कदम ताल कर के रोज चलेंगे
तुम कतार-ए-मौत में मिल लेना..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
73879 22843
#mythoughts  #mywriting #kshanatch  #Kabira #kshan #like4unforgotablememories #like4comment

कुछ इस तरहसे..! :-)


♥ क्षण..! ♥

कुछ इस तरहसे..

वक्त का सुरुर देखीये...
मुलाकाते होती थी
वक्त बितता नहीं गुजरता था..
अब वक्त मिलता नहीं..
मुलाकाते होती नहीं
और वक्त गुजरता तो है,
पर वक्त बितता नहीं..
शायद कुसुर अपना ही होगा
वरना बातें युं बातो बातो में
बनाई और बिगाडी नहीं होती..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
73879 22843
कुछ इस तरहसे जिंदगी को मैने आसान कर लिया..
किसी को दफा कर दिया, किसी को आझाद कर दिया..!

Thursday, July 27, 2017

प्रपंच..! :-)


♥ क्षण..! ♥

प्रपंच..!

मी:..चल राहू दे! तुला कशाला हवी सरीवर सर? उगाच अंगावर थेंबांचा असर? ओल तशीही तुझी तुला येते. घरभर वात्सल्याचा सुवास दरवळत ठेवते. मातीची ओढ, तिची तृष्णा आणि उपजण्याची किमया तुला कशाला उसनी हवी? म्हणून राहू दे...

ती: कितीही काही म्हटलेस तरी बाईचं बाईपण आणि स्त्रीचं स्त्रीपण जपून ठेवावं लागतं. उसनं असलं तरी. चौकट आणि उंबरठ्याचा भावबंद एक करतांना भिंतीही मला जिवंत ठेवायच्या आहेत. माझ्या पदराचा वास म्हणून तेव्हा माझं असं काय या घरात याचं उत्तर मला सापडेल. अन्यथा परक्याचं धन म्हणून मला माझ्या माहेरानी बालपणापासूनच तोडायला सुरवात केली होतीचं ना.. म्हणून उसन्या हव्यात सगळ्या गोष्टी माझ्या म्हणून...

मी: ..नाही कुठे म्हणतोय किंवा तुझं अस्तित्व कुठे नाकारुन पुसून काढतोय? शास्वत आहेच ना आणि शाबूत पण आहेच. मग हे सगळं नुसतं काहीतरीच नाही का..?

ती: ..तुला खरंच कळतंय का मी काय मागतेय? ते खरंच कळतंय तर तुला समजत तरी काय नाहीये? खिडक्यांची पडदे बदलावीत आणि पुन्हा घराची नवीन रंगरंगोटी करावी एवढी छोटी गोष्टचं आहे ही. पण तुझं नडतंय कुठे..?

मी: ..माझं काही नडत नाही. अडतपण नाही. बसलेल्या संसाराच्या घडीला पुन्हा विस्कटण्याची माझी इच्छा होत नाहीये...

ती: ..अच्छा! असं आहे तर. मग एक सांग घडी केलेली चादर पण चुरगळतेच ना? आतल्या आत ओल धरून तिची धागी कुजतातच ना? एकदा घडी उघडून ऊन दाखवायला नको..?

मी: ..तुला त्रास होईल. जो मला नको वाटतोय तुला पुन्हा व्हावा..!

ती: ..आठवणींचा कप्पा उघडला की, जखमा उघड्या पडतातच असं होत नसतं. त्रासाचं म्हणशील तर तो कप्पा उघडू न देण्याचा त्रास होतोय. हक्कय मला तर वर्तमानात आणि भविष्यातच पुढे-पुढे का जात राहू? थोडं मागेही डोकावून पाहू दे ना! कदाचित पुढचा प्रवास भूतकाळात डोकावून बदललेल्या वर्तमानाचा होऊ शकेल...

मी: ..ठीक आहे. तुझा हा स्त्री हट्ट मी पुरवणार पण माझी अट आहे. कोसळायचं न बिथरायचं नाही. विखुरलेलं रेंगाळत वेचत बसायचं नाही. प्रपंचात घुटमळत मुके हुंदके घ्यायचे नाहीत. एवढीच अट आहे माझी...

ती: ..कबूल..!

(..आयुष्याच्या मागच्या पानांवर लागलेली धूळ झटकल्यावर; तुमचं, माझं, आपलं-प्रत्येकाचं हे एक पुस्तक थोडं मागे जाऊन वाचण्यासारखं आहे. काही धागेदोरे हाताशी लागतीलही. काही गाठी पडतीलही. थोडं आयुष्य सैल झाल्यावर या गाठोड्यात काय मिळतं ते तुमचे तुम्हीच बघा. वाटलं तर कळवा पत्ता तुम्हाला माहिती आहेच..!

योग्यवेळी लख्ख प्रकाश 'उजाळे'..
कणकण सरकता आभाळ काळे,
बघ तुझे तुला काय-काय गवसते..
मला खुनावतायेत ती ही बंद ताळे..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Thursday, July 20, 2017

बधिर..! :-)


♥ क्षण..! ♥

बधिर..!

बाहेर मग धुंद
वादळाची एक रात्र,
माझ्या हातात
तुझे शेवटचे ते पत्र..
ख्याली खुशाली
कितीतरी सांत्वन,
अजूनही नंतरही
ओळीतही भिजणं..
तुला कळले नाही
मी कळवलेही नाही,
उत्तर देऊन देखील
प्रश्न मी केलेही नाही..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

'तू..!' :-)


♥ क्षण..! ♥

'तू..!'

कितीही आवरत घ्यावं किंवा थोपवतं घ्यावं म्हटलं तरी माझ्या मनातलं कागदावर उरतंच! न लिहिण्याची ताकीद, धमकी आणि आज्ञा होईपर्यंत थांबून राहायचं. गप्प बसायचं. कोरी कागदे सोडायची. न राहवून कागदे लिहून काढलीच गेली तर टराटरा फाडायची. आग लावून जाळून टाकायची. लिखाणाचा सराव विसरुन जायचे. संवादांची माध्यमे बदलत असतांना शब्दांची लोचने अंगीकारायची नसतात. तरीही सराव हवाच! निदान मांडता तरी यायला हवं. ढाचाच ढेपळाला तर मग लिखाण काही कामाचं नसत. विषयांची तुटक माहिती होते. अवघड लिहिण्याचा पिंड साधं, सोपं सहज लिहिण्याचा झाल्यावर प्रगल्भतेचा तो उच्च स्तर, पुन्हा सर करण्याची उर्मी आतमध्ये राहत नाही. लिहितोस मध्येच सोडतोस, गायब होतोस, लिहूनही कुणाला वाचायला देत नाहीस, बऱ्याचदा तर तोच-तोचपणा होतो. काहीतरी हरवल्या हरवल्यासारखं वाटत लिखाणात. मन लावून लिहिलेलं वाटत नाही. रोज वाचायला खेटे घालणारे लोकं लिहिलेलं रेटत वाचून काढतात. वेगळं त्या थराचे उमटवतांना स्वतःची गात्र पुलकित झाली नसतील तर कोणाच्या भावनांना कसले उमाळे येतील? आणि कागदावरच्या नजरेला डोहाळे कोणत्या गर्भधारणेची लागतील?
मैफल गाजवता येते. मैफल जगवता आली का कधी? सुखी आयुष्याचे प्राक्तन अधाशासारखं बकाबका हादडतांना निर्मळ कारुण्य उपभोगलेच नाही. मग सुरकूतलेलं तारुण्य कळण्याची आपली काय बिशाद? अंडी तडकायचा काय तो अवकाश भेग गेली की झालं. जीव येतोय की जातोय हे पाहायला वेळ कुणाला नाही. आपली पावलं प्रवाहाच्या दिशेने करायची. तोंड फिरवून घ्यायची आणि सरतेशेवटी संबंधही काढून घ्यायचे. एवढेच असते 'आयुष्यात' वर्तुळ स्वरूपात. प्रामाणिक स्वतःही स्वतःसोबत नसत कोणी. मग शब्दांचं काय? कागदांचे काय? विषयांचे तरी काय? उत्तर आहे का..? आहे ना उत्तर. ते माझे उत्तर म्हणजे  'तू'..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३