Powered By Blogger

Sunday, December 27, 2015

दैनंदिन..! :-)


♥ क्षण..! ♥

दैनंदिन..!

घरापासून मी असा दूर आहे
घरीही मला जाता येत नाही,
वाट पाहतात जी डोळे माझी
मिठी त्यांना मारता येत नाही..

दिवस राबतो रात्रसुद्धा झटते
स्वप्नातलं चित्र खरं दिसत नाही,
दमतं शरीर माझं मिळतो पैसा
सुखाचा आरामचं मिळत नाही..

एकदा येऊन भेट निरोप असतो
हसणारा ओठ माझा असत नाही,
रमणं होतं आहे त्या परिस्थितीत
सहवासात फारसे करमत नाही..

स्वतःशी स्पर्धा करुन जगणं होतं
जग जिंकण्याचा आनंद होत नाही,
गंध दरवळतो सतत मातीचा पण
अफाट गर्दीतला घाम जिरत नाही..

रोजच्या चढाओढीत वरचढ ठरतो
माझं माझ्याशीच हरणं होत नाही,
असचं परत फिरावे एकदा माघारी
उधारी उंबरठ्यांची बाकी देत नाही..

तू वेळेवर आठवणही काढत नाही
पोच पत्राचीही कधी पाठवत नाही,
स्वतःतच गुंग तू आहेस रे माणसा
इथे परकं आपलं कधी होत नाही..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Saturday, December 26, 2015

संकोचणं..! :-)


♥ क्षण..! ♥

संकोचणं..!

अम्म्म! बोलायला कुठल्यातरी एका विषयाने सुरुवात होते. बोलणं कमी आणि उत्तर द्यायलाच फार वेळ लावण्यात जातो. बोलायचं बरंच काही असतं पण वेळेवर जो तो बांधला जातो. कधी वेळ असतोही किंवा मिळतोही तेव्हा संकोच केला जातो. ही वेळ नाही आणि हा विषयही नाही आता बोलायचा! निव्वळ संकोचणंचं जे काही असेल ते फक्त साठवणं औपचारिक म्हणून बोलणं आणि कर्तव्य म्हणून निभावणं! एक नातं तुझं-माझं आणि संकोचाचं..!
---------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Friday, December 25, 2015

अडीच शब्द..! :-)


♥ क्षण..! ♥

अडीच शब्द..!

'प्रेम' हे लोकप्रिय अडीच शब्द आहेत हे सर्वश्रुत आहे. या अडीच शब्दांत बऱ्याच लेखकांचे संपूर्ण आयुष्यही गेले. काही हे तर कधी ते या अडीच शब्दांची पाठ कुणीच (धो)थोपटली नाही. या अडीच शब्दांच्याच तोडीचा अजून एक शब्द आहे 'लग्न' आता याचा मतितार्थ काय हे लग्न झालेल्यांना चांगल्याने ठाऊक आहे. प्रेमाचे ज्वर आणि लग्नाचे सोहळे हे 'निर्णय' शून्य करतात. कारण आपण नेमकं शोधत काय आहोत आणि भेटत काय आहे यावर तुलना होते. त्याचबरोबर अवस्था वाईट आणि बिकट होते. कुठे बोलायला जागा आपणच बुजवून बंद केली असते. शेवटी होईल जे काय व्हायचे आहे ते यावर अनेक आयुष्य त्यांच्या लेखी यशस्वीरित्या सुरु आहेत. आपलं काय? लग्न इथेच थोडी काही अडलेलं आहे. जसं प्रेमाच्या कडले तसं काहीसं लग्नाच्या पलिकडे अलिकडे मध्येच खड्ड्यात.. अडीच शब्द..!
---------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Wednesday, December 23, 2015

स्टेटस..! :-)


♥ क्षण..! ♥

स्टेटस..!

आपलं स्टेटस असं बनवायचं की, आपल्यामुळे कुणाला स्टेटस बनवता येईल! बाकी कुणाचं स्टेटस ढापूण गाढवपणा केल्याचा पश्चाताप होतो तो वेगळा आणि स्टेटस ढापला गेलाय हे कळतं तेव्हा वाढणारे स्टेटस प्रेस्टीजिअस असते..!
--------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Sunday, December 20, 2015

कळत नाही..! :-)


♥ क्षण..! ♥

कळत नाही..!

आपल्यांनीच दुखरी नस दाबून धरल्यावर ओठांनी हसण्याशिवाय दुसरी प्रतिक्रिया काय द्यायची असते? काहीच प्रतिक्रिया न देण्यामागचे कारण एकतर ज्याला ते दुखरी नस समजतात ती बधिर नस असावी किंवा संवेदना शून्य ते एक अस्तित्व तरी असावे याही पलिकडे यातना अथवा वेदना देण्याचे कसब अर्थशून्य झाले असावे... म्हणूनच हल्ली फरकच काय काही कळतही नाही..!
---------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Wednesday, December 16, 2015

फसणं..! :-)


♥ क्षण..! ♥

फसणं..!

निखळ गप्पा, मोकळा संवाद,
थोडा नव्हे! बराच मोठा वाद,
थोडं हसणं, बरचं रुसणं, मग?
जाणून घेणं, पुन्हा विसरणं अन्
पुढे चालणं, वाट पाहणं, थोडसं
थांबू थांबू जाणं, उगाच वैतागणं,
असाच आहे म्हणणं, जवळ येणं,
डोळ्यात वाचणं, आपलं ठरवणं,
पुन्हा चालतं होणं, कसलं जगणं?
तुझा तू, तुझी तू अजून भांडणं,
बसं! आता खूप झालं इथे थांबणं..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Tuesday, December 15, 2015

जात नाही..! :-)


♥ क्षण..! ♥

जात नाही..!

माणसांमध्ये माणूस विचारला जात नाही
बघ आता मंदिरात दगड पूजला जात नाही,

व्याभिचारसुद्धा करतोय कष्टाशी शेतकरी
साधी! मीठ-भाकरी घशाखाली जात नाही,

नजरा चोरतोय भरल्या पोटाने जो तो इथे
उपाशी निजलेली भूक पाहिली जात नाही,

धर्म विचारला जातो कुळ जोपासले जाते
कधी सहजच 'जात' सांगितली जात नाही,

गृहितके जोडून छत्तीस गुणं तापासली हो
मंगळाची दशा न दिशा बदलली जात नाही,

पैशांचे व्याजच काय हप्तेही दिली जातात
गरिबाला एकवेळ भिक घातली जात नाही,

फुकट शिक्षण चांगलं मिळत होतं मुलांना
पैसे देऊन परिस्थिती शिकवली जात नाही,

सांगतो, लिहितो, बोलतो शेवटचे मी आता
वृत्ती, बुद्धी, नशीबे, स्वप्ने वाटली जात नाही,

फार वाईट वाटतं पाहून एक नजर जगाला
अवस्था आता फारशी पाहिली जात नाही..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Friday, December 4, 2015

मला आठवण येते..! :-)


♥ क्षण..! ♥

मला आठवण येते..!

नदी, खोरे, दऱ्या, कपाऱ्या अगदी गावातल्या पाऱ्याचीही
जिथे बुद्धी खुंटते अशा अडगळीत असलेल्या धुळीच्या थरांचीही,
कित्येक चौकटी उभ्या राहिल्या त्या बंद-उघड्या दारांचीही मला आठवण येते..
प्रसावली जिथे ओठात वेदना अशा जिव्हारी लागलेल्या जखमांचीही,
मंजुळ नाद, हळवा संवाद टीपायची काने अशा पैंजणांचीही,
तृप्त व्हायची नजर, कापरे होयचे स्वर अशा निसटलेल्या क्षणांचीही, मला आठवण येते..
परिस्थितीची एक चाल, आयुष्य बेताल अशा सौख्यभऱ्या दुःखाचीही,
कोसळत्या पावलांची, भिजलेल्या वाटांची अशा
संपलेल्या भेटीचीही,
राख झालेल्या देहाची, परतून आलेल्या पावसाची अन् कोरड्या दिवसाचीही, मला आठवण येते..
लुटवलेल्या प्रेमाची, मोबदले दिलेल्या शरीराची अन् वांझ झालेल्या नशीबाचीही,
चालढकल करणाऱ्या श्वासांची, जाणीवा मेलेल्या प्रेताची अन् ओरखडे पडलेल्या मनाचीही मला आठवण येते..
उभ्याने जळणाऱ्या प्राजक्ताची, वठलेल्या गुलमोहराची अन् उसणं हसणाऱ्या रातराणीचीही,
बहरुन रुसलेल्या बागेची, काठावरच्या एकाकी लाटेची अन् उपरा झालेल्या किणाऱ्याचीही,
तुझ्यापेक्षाही खूप मला आठवण येते..!

सांग आता मी विसरायचं काय आणि कसं???
--------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

Tuesday, December 1, 2015

नव्याने..! :-)


♥ क्षण..! ♥

नव्याने..!

दैनंदिनीत पुरुन उरता येत नसतं तेव्हा थकवा फार जाणवत असतो आणि पुरुन उरणं झाल्यावर उत्साह वाढत असतो. कसला? तीच भातुकली पुन्हा नव्याने मांडून जगण्याचा..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

Friday, November 27, 2015

वाया..! :-)


♥ क्षण..! ♥

वाया..!

नात्याचं पापुद्र अलवार काढायचं आणि अश्रूंच्या तेलात फोडणी द्यायची... आठवणींची रेसिपी थोडी बिघडते आणि बऱ्याचदा तर वायाच जाते..!

वाया जाणाऱ्या वेळातून वेळ काढलेला..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

प्रसंग..! (व्यासंग) :-)


व्यासंग वरुन एक प्रसंग आठवला
कोणता?... :-) सांगतो... ;-)

♥क्षण..! ♥

प्रसंग..! (व्यासंग)

तो दिवस तुझ्या-माझ्या भेटीचा
नाव नसलेल्या हळव्या नात्याचा,
पेलायचा अन् बराच त्यागायचा
हृदयावरच्या अलवार जखमेचा,
ओल्या अश्रूंच्या मुक्या वेदनांचा
स्थिर अस्थिर बदलत्या स्थितीचा
खोटंच करणाऱ्या परिस्थितीचा,
थट्टा मांडणाऱ्या षंढ नशिबाचा
स्पर्शाला मोहवणाऱ्या ओढीचा,
विस्मयात नेणाऱ्या एका प्रसंगाचा
वास्तव सांगणाऱ्या अतिप्रसंगाचा,
शुद्ध प्रेम करणाऱ्या शुद्र दुनियेचा
भेसळ होणाऱ्या दीर्घ श्वासांचा,
तो एक क्षणभंगुर 'क्षण' क्षणांचा
गळून गेल्या कित्येक पानांचा
अन् आठवांच्या बऱ्याच व्यासंगांचा..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

Thursday, November 19, 2015

विचारांचा नागडेपणा..! ( फटकळ तडका) :-)


♥ क्षण..! ♥

विचारांचा नागडेपणा..! (फटकळ तडका)
चारित्र्य, शील आणि अब्रू वैश्येलाही असते. सुसंस्कृती मुलगी, स्त्री आणि बाई यांची मर्यादा ठेवत असते. तर शब्दांच्या चारित्र्याची मर्यादा मर्यादेतच ठेवायची असते. तिला सभ्यतेचे मुखवटे लावून कागदाला उगाच बाजार बसव्यात आणून ठेवायचं आणि प्रदर्शनासाठी बोली लावायची असा प्रसिद्धीचा लिलाव दर्शवणारा प्रकार हा निच्च, गलिच्छ, वावगं आणि अश्लीलच असतो. भलेही यासाठी अनेक शद्ब प्रचलित असतीलही त्यांचा भावार्थ सदुपयोगासाठी करावा लागतो आणि त्यांचा संदर्भ हा जागृतीसाठी मांडावा लागतो. स्वतःची आवड उर्फ चॉईस यासाठी एकत्रित बांधल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाला स्पष्ट शब्दाचा विचारांचा नागडेपणाच म्हणणे उचित असते..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Monday, November 16, 2015

गुडबाय..! :-) (1)



♥ क्षण..! ♥

क्षण संदर्भचित्र :  प्रसाद वाघ यांच्या भिंतीवरुन
चित्रकाराची कलाकारी २०१२ सालची
कलाकार : Yuliya Vladkoska

१)(प्रेस नोट) बातमी : प्रेयसीला गुडबाय कार्यक्रम संपन्न..!

जळगाव, दि.१६- येथील प्रख्यात प्रियकर असलेले आणि प्रेमाचे अभ्यासक "अमुक तमुक" यांच्या विद्यमाने प्रेयसीला गुडबाय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पूर्व प्रेमाच्या गुप्त गोष्टी व्यक्त न करण्याच्या अटीवर अनेक प्रेमवीरांनी "प्रेयसीला गुडबाय' कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन उत्स्फूर्त असा सहभाग घेतला. प्रेयसीच्या ओठांवर बोट ठेवत प्रेयसीला शेवटचा निरोप देण्यात आला. 'अमुक तमुक' संस्थेच्या वतीने प्रियकरांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन 'टिंब टिंब'येथे 'तमक्या'वेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष सतराशे साठ ब्रेकअप झालेले श्रीयुत श्रीमान प्रियकर हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी तमाम प्रेमवीरांना प्रेमात पडून अनाहूत बळी जाऊ नये असा संदेश दिला. त्यांच्या प्रेरणेने प्रेरीत होऊन अनेक प्रेमवीरांनी आपली आत्मकथा व्यक्त केली असून लवकरच "अमुक तमुक" संस्था त्यावर पुस्तक प्रकाशित करणार आहे. प्रियकरांना हक्काचे व्यासपीठ मिळावे असा हेतू आयोजकांचा होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमके नी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तामक्यांचे विशेष सहकार्य लाभले.
......
२) जाहिरात पंचलाईन..! :
प्रेमात पडल्यावर पुढे काय..
फक्त शेवटचा एक गुडबाय..!
......
३) गुडबाय ग्रिटींग..! :- (कविता)
नकळत भेट झाली अन्
पुन्हा प्रेमात पडणे झाले..
पूर्वी मनमोकळे होते अन्
आज गालात हसणे झाले..
जा आज तू खुशाल निघून
मनापासून हे सांगणे झाले..
स्पर्शून ओठांना एकदाच
प्रेयसीला गुडबाय करणे झाले..!
.......
४) चारोळी
पुन्हा पुन्हा नाही फक्त
आता शेवटचे सांगितले,
हाय-हॅल्लो सारखेच इथे
गुडबायही कॉमन झाले..!
.......
५) मृदुंग इस्ताईल..!
क्षण..! :-
नजरा नजर झाली... प्रेमाची लहर आली... सगळ्यांनीच केले म्हणून प्रेमात हृदये बरबाद झाली... प्रत्येकाची इच्छा होते... प्रेमात शेवटी वेदनाच उरते... सांगत होतो जरा कुठेतरी थांबायला हवे... चक्क शेवटचा गुडबाय करायला हे कसले कारण होते?... सहवासाचा काळ खूप छान गेला... नुकसानीत मात्र उभे आयुष्य गेले... न राहावून एक निर्णय मी घेतला गुडबाय करायचा... तर तुझ्या का एवढे जीवावर आले..?
..........
६) मृदुंग इस्ताईल एका ओळीचे पत्र..! :-
प्रिय प्रेयसी,
माझी दारं तुझ्यासाठी कायमची बंद झाली, गुडबाय नावाची पत्रे निनावी तुला पाठवली..! (बस कुणी पाठवलंय शोधत)
..........
७) मृदुंग इस्ताईल जाहीर पंचनामा..!(सूचना)
माझ्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची भीक मागायला आल्यावर दारा बाहेरुन जोरात बेंबीपासून ओरडावे आवाज हृदयात पोहोचला तर भीक मिळेल अन्यथा समोरची दारं वाजवून पाहावी. प्रेमाची चेष्टा करायची आल्यास जाहीर अपमान केला जाईल. काळजाला भोकं पडतील अशा विषारी शब्दांचा जीवघेणा प्रयोग यशस्वीरीत्या केला जाईल. सर्व नियमांचे काटेकोर पालन झाल्यावर प्रेमात बाय बोलणे झाल्यावर पूर्व कल्पना न देता थेट गुडबाय कोणत्याही क्षणी बोलले जाईल याचा आयुष्यावर विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेतली जाईल..!
...........

हुश्श! दमलो अर्ध्या तासात काय काय लिहिले काय माहीत ठरवा तुम्हीच कसे जमलंय :-) परिणामांची चिंता मी आजही करत नाही..!

आणि हो गुडबाय बरं..! :-P
....------------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Tuesday, November 10, 2015

उत्सवाचा शुभ पर्व..! :-)


♥ क्षण..! ♥

उत्सवाचा शुभ पर्व..!

प्रसन्न प्रातःचा कोवळा संघर्ष..
सप्तरंगांचा उगा अंगणात हर्ष..
नात्यांचा - आपलेपणाचा सुखद वर्ष
सरुन गेल्या दुखावर सुखाचा नवा संदर्भ..
लक्ष दिव्यांनी सजलेला उत्सव शुभ पर्व
मणी गोंदलेला एकात्मतेचा उत्साह अपूर्व..!

दीपोत्सवाच्या आभाळभर शुभेच्छा..!
-------------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Monday, November 9, 2015

हॅप्पी दिवाळी..! :-)


♥ क्षण..!
सन उत्सवाचा...
अंधाराला उजाळण्याचा..
संस्कृतिच्या परंपरेचा..
उटण्याच्या सुगंधाचा..
मनस्वी आनंदाचा..
तेजोमय सुखाचा..
उज्ज्वल भविष्याचा..
अतूट नात्यांचा अन्
ऋणानुबंधाचा..!

दिपोत्सवाच्या आभाळभर शुभेच्छा..!
----(मृदुंग™)पियुष खांडेकर आणि सहपरिवार
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Monday, October 26, 2015

कोजागरी म्हणजे..! :-)


कोजागरी म्हणजे...
जागृकतेचा, वैभवाचा, सुखाचा
आणि आनंदाचा उत्सव..
कोजागरीचे जागरण...
जीवनातील सकारात्मकतेला
वाढवून सौम्यतेने सुखाची
सौंदर्य अनुभूती देते..
कोजागरीच्या शुभ्र चांदण्या रात्री...
चंद्राच्या शीतल प्रकाशाच्या सानिध्यात
मधुर केशर मिश्रित आटीव दुधासारखा
गोडवा आयुष्यात भरणे..!

कोजागरीच्या आभाळभर शुभेच्छा..!
------------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com

Monday, October 19, 2015

न पाठवलेलं पत्र..! :-)


♥ क्षण..! ♥

न पाठवलेलं पत्र..!

मला माहीत होतं तुझ्या पत्रात असाच काहीसा मजकूर असेल... म्हणून पत्र उघडून वाचावे असे मनात येऊ दिलेच नाही... मनावर जरी नियंत्रण असले तरी हृदयावर कुठं नियंत्रण मिळवता येते? पाण्याला बांध घालून निश्चित अडवता येत असतं पण आठवणींच्या उधाणलेल्या लाटांना काही करुन थोपवता येत नसतं...
ओझं बननं आणि ते पेलनं दोन्ही दुय्यम गोष्टी आहेत. आपण कुणावर ओझं बनत आहोत अशी आपली वैचारिकताही एक ओझंच आहे. मुळात जबाबदारी व आयुष्याच्या प्रवास सुखकर होण्यासाठी बांधली गेलेली गाठ ही ओझं वाहून घेण्यासाठी पडत नसते...
समजनं, स्वीकारनं आणि आपलं करणं या प्रेमाच्या हळव्या व्यवहारात आपलं ओझं-मन वाटून घेणं असतं. जेणेकरुन आयुष्याच्या प्रवास हसत खेळत पूर्ण होईल... गालावर ओघळलेल्या अश्रुमधुन तुला मोकळं आणि व्यक्त होता येतं..पण माझं काय? हताश, आधार आणि ढासळनं काही केल्या तुला रुचणारं नसतं...
स्वतःबद्दल तुझ्याकडूनच माझ्या एवढ्या चांगल्या कल्पना असल्यावर तुझं सात्वन आणि तुझ्या व्यक्त होण्याच्या वाटेवर अडगळ म्हणून मी माझं अस्तित्व का ठेवावं? गालावर ओघळलेल्या आसवांना ओठांनी टिपतांना समाधान मिळत नाही. उलट मनात पडलेल्या कोरडला थोडा ओलावा मिळतो...
खरंच शोधायचे असेल तुला तर समाधान हे ओठांवरच्या आणि नजरेच्या हसण्यात शोधून बघ! बंधारा भरला म्हणून धरणाची दारं ही उघडाविच लागतात कारण साठवणुकीची मर्यादा ही ठरलेली असते. वाहत जाणाऱ्या पाण्याकडून आपण फक्त प्रत्येक क्षणाला आणि घटकाला स्वीकारायचे कसे? हे शिकायचे असते..!
---------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Sunday, October 18, 2015

समाजाला काही देतांना सामाजिक मुल्यांचे भान असायला हवे..! :-)

समाजाला काही देतांना सामाजिक मुल्यांचे भान असायला हवे..!



Saturday, October 10, 2015

डोळा..! :-)


♥ क्षण..! ♥

डोळा..!

पहिल्या प्रेमाचं ते वय सोळा आहे
अन् आज ती सुवर्ण नक्षी तोळा आहे,

हटवली होती उगा सारी गर्दी त्यांनी
माझं वैभव बघण्यास गाव गोळा आहे,

फक्त एक कागदच होता माझा समोर
कितीदा शब्दांचा केला चोळामोळा आहे

ओठांनी हसत राहिलो मी आजसुद्धा
केरातून उचलला कवितांचा बोळा आहे,

शब्दांचे बैल म्हणोत मला हरकत नाही
माझ्या कागदाचा धनी मनवतो पोळा आहे,

कशाला माझी नजर असावी कुणावर
जेव्हा माझ्यावरच प्रत्येकाचा डोळा आहे..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

हसण्यावाचून ओठांवर काहीच उरत नसते...! :-)



हसण्यावाचून ओठांवर काहीच उरत नसते...! 


Wednesday, October 7, 2015

पुन्हा प्रेमात पाडण्यात मजा आहे…! :-)

पुन्हा प्रेमात पाडण्यात मजा आहे…!




पुन्हा होतो मी तुझा…! :-)

पुन्हा होतो मी तुझा…!





Sunday, September 13, 2015

आपण..! (सिंगल आफ्टर मॅरेज) :-)


♥ क्षण..! ♥

आपण..! (सिंगल आफ्टर मॅरेज)

आपण, तसा तर तीन अक्षरांचा एक शब्द आहे. तू तुझ्या टोकावर आणि मी माझ्या टोकावर या दोन टोकांना एकत्र आणणारे बेट म्हणजे आपण. आता विभक्त झाल्यावर स्पष्ट भाषेत फारकत झाल्यावर संबंधांना सोप्या शब्दात नात्याला पुन्हा बेटावरच्या आपण या नौकेत वल्ल्हवण्यासारख कारण काय असतं? पटत नाही- सुर जुळत नाही- एखादा स्वर बेसुर लागला झालोत वेगळे! मनात असलेल्या गोष्टी दडवल्या भुतकाळाची कल्पना दिली नाही याची फसगत केल्याचा पुरावा उभा वर्तमान असल्यावर आणि ताणलं म्हणून तुटलचं! अर्धवट अपेक्षेवर उपेक्षा करुन फरफटत असण्यापेक्षा तुटेल एवढं मी ताणतोच..!
हो! कोंडामारा स्वतःसोबत तुझा कशाला म्हणून करावा? अधिकार होते तेव्हा त्रास आणि अधिकार संपुष्टात आणूनही जाच वाटतोच! माझ्याकडून तुला काही नको होतं आणि तुझ्याकडे माझं असं काहीच नव्हतं. ते अजूनही तुझं तुझ्याकडे माझं माझ्याकडे व्यवस्थितच आहे. अगदी बरोबर शिल-आब्रू-इभ्रत अगदी तशीच पवित्र आहे स्पर्श करुन नासवलं आणि उष्ट केलं असा फसवणुकीचा व्यवहार मी केलाच नाही. तू स्वतः जवळ आलीस तरीही! त्या क्षणाला कसबीनं लाथाडलेच आहे. कारण ती फक्त नात्यातल्या व्यवहाराची गुंतवणूक होती. नात्याची गुंफन करणं तुला? नको, मलाच जमले नाही..!
मी अंतर ठेवलं बऱ्याच मैलांची उंची सुद्धा गाठली. जाणारी-येणारी वाटं मोकळी राहू दिली. तुझे तुला भेटणे आवश्यक होते आणि मला माझे! एकमेकांना भेटून सर्रास होणारा व्यवहार अपहार असतो. त्याला टाळून एकत्रित येणं हे 'आपण'मध्ये समाविष्ट उगाच कसं करायचं? का करायचं? तू जोडते जोड म्हणालो, तोडते तोड म्हणालो! पण आपण जपू या नात्याला असं माझं म्हणन सहज विसरुन जायचं..!
बरं केलस! हो, खरंच बरं केलस. आज आठवलं ना तुला ते सगळे? अगदी नातं तुटल्यावरच सर्व कळले. इथेही तुझी अपेक्षा होतीच मी पुन्हा एक संधी द्यावी आणि तुटलेल नातं पुन्हा जुळवून घ्यावं! पण याची खात्री काय? की पुन्हा असे होणारच नाही? नात्यातून एकदा विश्वास उडाल्यावर पुन्हा तो मिळवणं शक्यच नसतं. मग कितीही चांगुलपणा जपला आणि कितीही तोंड गोड केलं तरी नात्यातला कडवटपणा आयुष्यभर जात नाही तो रेंगाळत राहतो अपमानासारखा..!
सन्मान करता येत नाही म्हणून अपमान करायचा नसतो! हे जरी बरोबर वाटत असले तरी व्यक्तिसापेक्ष स्वभावाच्या आणि अनुभवाच्या चौकटीत बसवल्यावर प्रत्येकाला माझंच खरं करायची सवय असते. साध्या सुध्या जखमासुद्धा जीवघेण्या होऊन त्यांना हसत सहन केल्यावर सहजतेने मनात नसतांना 'इगो' हा दुखावला जातोच कारण कोसळल्यावर पुन्हा सावरणे शक्य नसते. ज्या वाटेला पुन्हा चालायचेच नाही त्या वाटेला पुन्हा पावला खाली आणून लाजवायचेही नसते..!
एकदा चढलेल्या चौकटीत मी माझा प्रामाणिक राहू शकतो. पण एकदा सोडलेल्या चौकटीत परत येऊन अपमानाने तुंबलेल्या नजरांना सामोरे जाणे आणि स्वतःमुळे लाजीरवाणे जातवले जाते हे कळने असह्य होते. नातं तोडण्याआधी नातं शाबूत असायला एक नव्हे, शांतपणे कळत-नकळत हजार संध्या दिल्या जाऊ शकतात पण एकाने देत राहायच न दुसऱ्याने स्वैर असायच कण भराचा स्वार्थीपणा जपायचासुद्धा नाही ही कदर रुपी अपेक्षा आपल्या 'आपण' वेगवेगळ्या तू आणि मी मध्ये हास्यास्पद उरली आहे. दोन टोकं एकत्र आणून गाठ बांधता येते. ती बांधलेली गाठ जपण्यासाठी टोकावर यायचे की सोडण्यासाठी टोक गाठायचे हे नात्यात पडणाऱ्या गाठीच्या नकळत ठरवायचे असते. तेव्हा तू मी बरोबर आपण म्हणू शकतो अन्यथा "सिंगल आफ्टर मॅरेज" याची उद्या होणारी मोठी संकल्पना मला नाही वाटत विशेष काही महत्त्व ठेवेल नात्याचे..!
------------------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Monday, September 7, 2015

कागदावर शब्द नाचले..! :-)


♥ क्षण..! ♥

कागदावर शब्द नाचले..!

कळ निघावी काळजातून जमावे सर्व आपले
माझ्याही कागदावर अगदी तसेच शब्द नाचले,

भान होते की नव्हते जगाला मला ठावूक नाही
लेखणीच्या टोकावरुन कागदावर शब्द नाचले,

घृणा वाटली स्वतचीच एकदा मलाही अशीच
उघड होते सत्य तरी उपहासाने शब्द साचले,

इच्छा होती फार नव्हती कुणा इतकी माझीच
चुरगाळून आयुष्याला कागदावर शब्द वाचले,

काय सांगावे मी तरी मलाच माझे हाल आता
ओंजळ बंद करुन मरणास माझे शब्द याचले,

झुकणार नाही वाकणार नाही लाजवेल मला
कसला वेगळा आणणार रे तू शब्द जाs चले,

कागदाला स्मरून अखेरीस मी माझे सरण
तुला शब्दाने दिलेल्या वचनाला शब्द टाचले..!
------------------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Saturday, September 5, 2015

नाना पाटेकर इश्टाईल..! ^_^


♥ क्षण..! ♥

नाना पाटेकर इश्टाईल..!

जमलात पुन्हा सगळे या या
तुमच्यासाठीच तमाशा मांडलाय
नाही कंबर नाही हलणार आणि
ढोलकी सुद्धा नाही वाजणार पण
तमाशा होणार एक तुझा तरी
अन्यथा माझा तरी, तमाशाच का?
एक हाच प्रकार आहे जो प्रत्येक
पुरुषाच्या इच्छेने होतो व अगदी
फुरसतीने होतो, ती येईल ठुमकत
आणि डोळे मिचकवत अधाशीपणा
तुझा काय सुटणार आहे? बसशील
वाट बघत, छेड काढत, इज्जत
नसतेच, उपभोग असतो तुला कसं
पक्क ठाऊक झालेलं आहे. नाही का?
बाटली काढशील, प्याला भरशील
सेज सजवायला फुलंही उधळशील
ती नाही म्हणेल, तू पुरुषार्थ गाजवशील
गरम माथ्याने मुस्काटात लावून देशील
ती तुझी तहान भागवेल, मात्र ती...
तहानलेली, अपूर्ण तशीच राहिल...
तुला हवे तसे तिला कुस्कारीत राहाशील
पण ती इच्छे विरुद्ध तुझ्या मिठीत येईल
तू प्याला भरत राहाशिल रिता करशील
पण प्रेमाची तहान, सन्मानाने भागवशील?
हे तुझ्या रक्तात नाही, घराण्यात आणशील?
नासवशील, लुटशील, वापरशील आणि
विकशीलही... एकदा जपून पाहशील?
छे! जमणार नाही! चप्पल पायात शोभते,
मिरवायला ठिक असते पण गळ्यात सोनेच
शोभते. असल्या छपन्न बाजूला काढशील
आणि एकदिवस तुझाच अंश असेच करेल
तेव्हा कुठल्या अधिकाराने थांबवशील?
घराणे पुढे चालवून तुझे हे सुख मिळवशील?
वळण लागायला वेळ लागतो. अनुकरण
करायला अवधिसुद्धा लागत नाही.
आधी विचार स्वतःचा कर स्वार्थी झालास
तरी चालेल पण हिंस्त्र जनावर होऊ नकोस
कारण हिंस्त्र जनावराला मारता येत पण
संयम राखून पशुला आवर घालता येत नाही..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
7387922843

शिक्षक दिन..! ;-)


♥ क्षण..! ♥

शिक्षक दिन..! ;)

प्रेमाची शाळा
विरहाचा गृहपाठ
अनुभवाचा अभ्यास
आठवणींचे पाढे
आसवांची बाराखडी
स्वप्नांची निरागसता
आयुष्याची षंढ प्रगती
श्वासांचे गणित
अंतरांचे उत्तम भूगोल
उपयोग शून्य विज्ञान
अर्थहीन इतिहास
हास्यास्पद चित्रकला
आळशी कार्यानुभव
दुमडून ठेवलेली सरस्वती
आणि खाली पिली छडी वाला मास्तर
आकर्षणाची सुंदर शिक्षिका
तासाला जमलेले गलेलठ्ठ मठ्ठ विद्यार्थी
आणि मी हातात डायरी झालेली वही घेऊन
एकसाथ सावधान विश्राम व जयहिंद करुन
रिता करुन टाकणारा बाक तसाच ठेवून
दोन बाकाच्या टेबलावर दोन कॉफी
पिणारे तिन हिशेब चूकते करुन मोकळा..!

काय तर विद्यार्थी जोमात मास्तर कोमात..!

घंटा अपशब्द शाळेत अतुरतेने घराची ओढ लावायचा आणि आता
मास्तर काय शिकवेल 'घंटा' असा वापरून नाम निराळा कारभार

तरी ही औपचारिकता शिक्षका ज्ञान वाट तंबाखू चोळून पिचकारी नको मारु सांगणारा
शेवटच्या बाकावरचा हुशार विद्यार्थी..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
7387922843

Thursday, September 3, 2015

माणूस..! :-)


♥ क्षण..! ♥

माणूस..!

माणसातून माणसाला आणि अध्यात्म्यातून परमेश्वराला वगळले तर अर्थ शून्य उरतो. माणसाची किंमत परमेश्वरा एवढी केली तर तो विनोद ठरतो. माणसाचा अर्थ शोधून पाहायला नजर शेजारी जाते स्वतःच्या मनात डोकावणे सहज जमत नाही. मोफत वस्तू झालेल्या माणसाला वापरणे आणि वापरले जाणे कळते एवढा चांगला उपयोग मनात आला तेव्हा निर्जीव वस्तूचाही होत नाही पण हे व्यक्त करणे म्हणजे माणूस होण्याची थट्टा करण्यासारखेच असते. सरतेशेवटी माणूस होण्याचा अर्थ काय पाहिले तर उपयोगात पडले याचे समाधान की उपयोगात आणले याचा आसुरी आनंद हे व्यक्तिसापेक्ष आहे. थोडक्यात माणूस हा शून्य आहे. त्याला अर्थ श्वास असे पर्यंत आहे आणि त्याचा उपयोग (मनात येईल तसा करता येऊ शकतो) अवलंबून होणारा कारभार व्यवहार अथवा व्यापार..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
7387922843