Powered By Blogger

Monday, October 19, 2015

न पाठवलेलं पत्र..! :-)


♥ क्षण..! ♥

न पाठवलेलं पत्र..!

मला माहीत होतं तुझ्या पत्रात असाच काहीसा मजकूर असेल... म्हणून पत्र उघडून वाचावे असे मनात येऊ दिलेच नाही... मनावर जरी नियंत्रण असले तरी हृदयावर कुठं नियंत्रण मिळवता येते? पाण्याला बांध घालून निश्चित अडवता येत असतं पण आठवणींच्या उधाणलेल्या लाटांना काही करुन थोपवता येत नसतं...
ओझं बननं आणि ते पेलनं दोन्ही दुय्यम गोष्टी आहेत. आपण कुणावर ओझं बनत आहोत अशी आपली वैचारिकताही एक ओझंच आहे. मुळात जबाबदारी व आयुष्याच्या प्रवास सुखकर होण्यासाठी बांधली गेलेली गाठ ही ओझं वाहून घेण्यासाठी पडत नसते...
समजनं, स्वीकारनं आणि आपलं करणं या प्रेमाच्या हळव्या व्यवहारात आपलं ओझं-मन वाटून घेणं असतं. जेणेकरुन आयुष्याच्या प्रवास हसत खेळत पूर्ण होईल... गालावर ओघळलेल्या अश्रुमधुन तुला मोकळं आणि व्यक्त होता येतं..पण माझं काय? हताश, आधार आणि ढासळनं काही केल्या तुला रुचणारं नसतं...
स्वतःबद्दल तुझ्याकडूनच माझ्या एवढ्या चांगल्या कल्पना असल्यावर तुझं सात्वन आणि तुझ्या व्यक्त होण्याच्या वाटेवर अडगळ म्हणून मी माझं अस्तित्व का ठेवावं? गालावर ओघळलेल्या आसवांना ओठांनी टिपतांना समाधान मिळत नाही. उलट मनात पडलेल्या कोरडला थोडा ओलावा मिळतो...
खरंच शोधायचे असेल तुला तर समाधान हे ओठांवरच्या आणि नजरेच्या हसण्यात शोधून बघ! बंधारा भरला म्हणून धरणाची दारं ही उघडाविच लागतात कारण साठवणुकीची मर्यादा ही ठरलेली असते. वाहत जाणाऱ्या पाण्याकडून आपण फक्त प्रत्येक क्षणाला आणि घटकाला स्वीकारायचे कसे? हे शिकायचे असते..!
---------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

No comments:

Post a Comment