Powered By Blogger

Thursday, July 20, 2017

'तू..!' :-)


♥ क्षण..! ♥

'तू..!'

कितीही आवरत घ्यावं किंवा थोपवतं घ्यावं म्हटलं तरी माझ्या मनातलं कागदावर उरतंच! न लिहिण्याची ताकीद, धमकी आणि आज्ञा होईपर्यंत थांबून राहायचं. गप्प बसायचं. कोरी कागदे सोडायची. न राहवून कागदे लिहून काढलीच गेली तर टराटरा फाडायची. आग लावून जाळून टाकायची. लिखाणाचा सराव विसरुन जायचे. संवादांची माध्यमे बदलत असतांना शब्दांची लोचने अंगीकारायची नसतात. तरीही सराव हवाच! निदान मांडता तरी यायला हवं. ढाचाच ढेपळाला तर मग लिखाण काही कामाचं नसत. विषयांची तुटक माहिती होते. अवघड लिहिण्याचा पिंड साधं, सोपं सहज लिहिण्याचा झाल्यावर प्रगल्भतेचा तो उच्च स्तर, पुन्हा सर करण्याची उर्मी आतमध्ये राहत नाही. लिहितोस मध्येच सोडतोस, गायब होतोस, लिहूनही कुणाला वाचायला देत नाहीस, बऱ्याचदा तर तोच-तोचपणा होतो. काहीतरी हरवल्या हरवल्यासारखं वाटत लिखाणात. मन लावून लिहिलेलं वाटत नाही. रोज वाचायला खेटे घालणारे लोकं लिहिलेलं रेटत वाचून काढतात. वेगळं त्या थराचे उमटवतांना स्वतःची गात्र पुलकित झाली नसतील तर कोणाच्या भावनांना कसले उमाळे येतील? आणि कागदावरच्या नजरेला डोहाळे कोणत्या गर्भधारणेची लागतील?
मैफल गाजवता येते. मैफल जगवता आली का कधी? सुखी आयुष्याचे प्राक्तन अधाशासारखं बकाबका हादडतांना निर्मळ कारुण्य उपभोगलेच नाही. मग सुरकूतलेलं तारुण्य कळण्याची आपली काय बिशाद? अंडी तडकायचा काय तो अवकाश भेग गेली की झालं. जीव येतोय की जातोय हे पाहायला वेळ कुणाला नाही. आपली पावलं प्रवाहाच्या दिशेने करायची. तोंड फिरवून घ्यायची आणि सरतेशेवटी संबंधही काढून घ्यायचे. एवढेच असते 'आयुष्यात' वर्तुळ स्वरूपात. प्रामाणिक स्वतःही स्वतःसोबत नसत कोणी. मग शब्दांचं काय? कागदांचे काय? विषयांचे तरी काय? उत्तर आहे का..? आहे ना उत्तर. ते माझे उत्तर म्हणजे  'तू'..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

No comments:

Post a Comment