Powered By Blogger

Friday, April 9, 2021

निर्बंध..!

 


निर्बंध लादले गेले की माणसाची नैसर्गिक बंडखोर वृत्ती जागृत होते. स्वतंत्र आणि स्वतंत्र हा मूलभूत हक्क व्यक्तीसापेक्ष असला तरी अपवाद बोटावर मोजण्या एवढेच निदर्शनास येत असतात. काळ कठीण असो किंवा दैनंदिन वृत्तीचे संस्कार जन्मजात अभिप्रेत असतात. अथवा सामाजिक मूल्यांचे भान ज्ञात झाल्यावर तरी. पण प्रत्येकात निर्बंधाची कठोरता आणि शिथलीकरण स्वभावतः असेलच याची अपेक्षा कुणीही करु नये. कारण सगळ्यातआधी काही भंग होत असेल तर त्या अपेक्षा. इच्छा वगैरे नात्यांच्या कोणत्याही आकडेमोडित नसतात..!

- ✍ मृदुंग®

kshanatch@gmail.com

+९१ ७३८७९ २२८४३


#coffee #author #writer #struggle #covid19 #blankpage #writersblock #inkandpaper          

 



No comments:

Post a Comment