Powered By Blogger

Sunday, March 10, 2013

निघूनच जावसं वाटत कायमच....!







क्षण...!

निघूनच जावसं वाटत कायमच....!

खरंच इतक दूर निघून जावसं वाटत ना कि परतायचाही रस्ता सापडायला नको, कधी कधी वाटत नात्यांच्या रोजच्याच कटकटीचा एकदाचा काय तो सोक्षमोक्ष "स्वताचा" लावूनच टाकावासा वाटतो, मनस्थिती इतकी विचलित होते ना कि आपल्या जवळचीच मानस दुखावली जातात अर्थात दुखावण्याचा हेतू नसतो पण परिस्थिती व्यक्तच होत नाही सगळच मग आलबेल होत, आपलं म्हणवनारेही मग हळूच एकट सोडून जातात, एकटच सोडायचं असत शेवटी तर स्वताच्या सहवासाची, आधाराची सवय तरी का लावतात? अन्
जाता-जाता म्हणतात "समजलं काय समजायचं ते" आणि आपण "ठीक आहे" येव्हडच बोलून मार्गाला लागतो जर ऐकून घेणारच नसेल तर का म्हणून तोंड उघडावं? उघडल तरी नडत अन् नाही उघडल तर जरा जास्तच नडत, असो ज्यांना जे कळायचं ते कळाल सोडा आता पुन्हा माघारी ढुंकूनही पाहू नका अस मनात येत...आपलं कोणी मागे राहील नाहीये आपण नसल्यामुळे कोणाच काही अडणार नाहीये, मग इथे थांबण्यात अर्थ काय? जाऊ आपण आपल्याही मार्गाला काही न बोलताच, काही न सांगताच, काही न कळवताच...

.
© मृदुंग

No comments:

Post a Comment