Powered By Blogger

Friday, March 23, 2018

वेदनेची एक कळ..! :-)


:-)
क्षण...!

"............." (मथळ्याला नाव तुम्हीच द्या...!)

तुझे तरी बरे आहे रे, लिहून मोकळा तरी होऊन जातोस.. आमचे काय बोलायलाही नाही जमत अन् कुणाला काही सांगायचे ठरवले तर शब्दही तिथेच साथ सोडतात... काय अन् कसे काय बोलायचे समजतच नाही बघ... खरे तर मनातले व्यक्तच करता येत नाही. नकळत काय अगदी ठरवून देखील नाही... काय विचार करशील, काय समजशील नुसते विचार मनात येतात अन् मनातच राहून जातात. असे का होतेय हल्ली कळत नाही...
सांगायचे नाही असे काही नाही पण उगाच तुला का म्हणून सांगावे माहित नाही.. तुला तसही काही वाटत नाही म्हणुन असेल कदाचीत, जे मी तुझ्याजवळच सहज व्यक्त होते. अगदी माझे मनही मोकळे होऊन जाते.. तुझं नंतर काय झाले? तुला काय वाटले? साधा विचार तेव्हा काय कधीच कुणाला पडत नाही. असे कसे रे तुझ्या बाबतीत होते... काय करतोस काय आमच्या या बोलण्याचे...?
अगदी सुरुवातीपासून विचार करायचा म्हंटले ना तर एक विचार हमखास आधी येतो. तो हा की "आज काही तरी बिनसले आहे तुला काहीतरी अगदी मोकळेपणाने सांगायचे आहे" हे तुला कसे रे कळते? अगदी वेळ काही ठरलेली नसते. म्हणतोस तरी ऐकून घ्यायला तू सवडही लगेच कशी रे काढून घेतोस? तुझा वेळ खराब करतोय की काय अजिबाद जाणवू देत नाहीस. असा कसा रे तू आता विचारत आहे, बोलत आहे तरी घुम्यासारखा फक्त ऐकत आहेस... तुला नाही वाटत का असे कधी? की आम्ही उगाच तुझ्याशी बोलतो, तुला काही सांगतो, तुला काही विचारतो ? नक्कीच काहीतरी वाटत असेल ना तुला? मग कधी तू तुझ मन का मोकळ करत नाहीस? कसे जमते तुला सगळे मनातच ठेवायला? गुदमरत नाहीस का? इतके बोलूनही तू एवढा शांत कसा राहू शकतोस सांग की...!
काय सांगू आता...?
प्रश्नही तुमचेच आणि उत्तरेही तुमचेच.. बस प्रश्नानंतर उत्तर देण्यात जेवढे अंतर आहे तेवढेच अंतर माझ्या शांत असण्यात आहे..! वाटलेच तर भरभरून बोलून मोकळा होऊन जाईल पण नंतर काय? आपल्यामध्ये काही बाकी अन् शिल्लक ठेवले नाही तर जगण्याची मजा काय असणार आहे? अधूरीच ठेवतो मी प्रत्येक गोष्ट. का ते यासाठीच कारण पुढे काहीही नसते. बस आपले मन पुढे काही असेल, आहे याची वाट पाहत तरी राहते. खोटी आशा बाळगून... माझंही असेच आहे. काही बाकी अन् शिल्लक ठेवायचे व्यक्त न करता. मग कोणी काहीही विचार करो, जे समजायचे ते समजो... मनात मात्र काहीच नसते व्यक्त करायला. मग शांतता जिव घेणी होत आली का बदलायचा विषय आणि आशय! नकळत मग पुन्हा सुरूवात करायची स्वत:च्या प्रत्येक प्रश्नाची स्वत:च्याच उत्तरा सोबत..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

No comments:

Post a Comment