Powered By Blogger

Tuesday, July 1, 2014

आयुष्याची चव..! :-)

क्षण..!

आयुष्याची चव..!

प्रेमाची भावना मनात जन्माला यायला लागल्यावर; असलेली मैत्री तुटेल असे प्रत्येकाच्या मनात येते. "आहे तसेच चालु द्यायला काय हरकत आहे?" हेच मनात असते. मित्र-मैत्रीण पुन्हा होवू शकतात. सुरवातीला झालेल्या नकळत्या मैत्रीतून एव्हढेही आपल्याला कळत नसते. आतल्या आत कुढत राहातो. एकमेकांच्या आयुष्यात चुक काय बरोबर काय दाखवत राहातो.
दिवस सरतात काळ बराच पुढे जातो. बाल्कनीतल्या खुर्ची-टेबलावर पाय लांब करुन बसलो असतो तेव्हा मनात येतं, चहा-कॅाफीची ही वेळ अजुन सुंदर झाली असती. रातीच चांदणं अजुन खुललं असतं अन् मनासारख्या आयुष्याची चव प्रत्येक क्षणात जिभेवर रेंगाळली असती. नाही का..?
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment