Powered By Blogger

Monday, September 1, 2014

आयुष्य गुलजार आहे..! :-)

क्षण..!

आयुष्य गुलजार आहे..!

काल पावसात भिजतांना थोडीशी तू ओली झाली. माहित होत भिजायला तुला अजिबाद आवडत नाही. तरीही भिजलीस माझे मन ठेवायला. कधी-कधी माहित नाही असं का होवून जात. एकमेकांच मन जपलं तरी चुकल्यासारख वाटून जात. कदाचित, तुझं मन मला जपता आलं नाही त्याची रुखरुख असावी.
माझ्यामुळे अनइच्छेने तुझ्या मनाला मुरड तू घातली असावी. माहित नाही असं का वाटतं. एकमेकांची सवय-आवड अगदी वेगवेगळीच. कुठल्याही गोष्टीचा स्वत:च्या लेखी असलेल्या महत्वाला, कुठल्याही स्वरुपात कोणी सहज दुजोरा देवू शकत नाही. पण! तू दिलास, अगदी सहज दिलास.
आनंद तेव्हा ओसंडून वाहात होता. कसं जमलं आणि का केलं याचा विचार केलाच नाही. किती सहज आवडत म्हणून मन जपलंस. वाटत होतं हा पाऊस थांबूच नये. वेळ पुढे जावूच नये. असंच हुंदडावं या पावसात. स्वत:चे अगदी अस्तित्वही विसरुन जावे.
पण! हा पण येतोच मध्ये. 'थरथरत्या ओठांत आणि गोठलेल्या शब्दात बस! कर ना आता किती भिजणार?' बराच पावसाळा बाकीये अजुन, पुन्हा भिज पण आता पुरे हं! अजुनही तसाच तो पाऊस नजरेसमोर पडत असतो. मनाला मुरड घालून दिलेल्या सहमतीत उत्साह तुझा नैसर्गीक असतो. मुखावर साधी रेषही नसते ना डोळ्यात संकोच.
कुणाला स्वत:पेक्षा जास्त महत्व देणे असते का हे? कि, स्वत:च्या मनासारख करण्यापेक्षा कुणाच्या मनासारख करणे असते? उघड तुझ्या सोबत या विषयावर बोलायचे तर तुझ्यासाठी हा विषय विनोदच होवून जातो. हसणे मग तुझे थांबता-थांबतच नाही. गाल धरुन काहीही विचार करतोस म्हणने चुकत नाही.
थोड तुला जपून बरचसे तुझे मला जपणे असते. आभाळभर दु:खावर कणभर सुखाचीच वाटावाटी होते. त्यातही मनात येतंच तुझ्या वाटेला किती आलं? थोड असलं तर ते ही मलाच वाढलं असतं. मग का म्हणू नये मी "तुझ्यासोबत माझं आयुष्य गुलजार आहे..?"
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment