Powered By Blogger

Saturday, September 20, 2014

थोड असं अन् थोड तसं..! :-)


♥ क्षण..! ♥

थोड असं अन् थोड तसं..!

कधी-कधी परिस्थिती एव्हढी वाईट होते कि, काय करावे काहीच सुचत नाही. हाक द्यावी कुणाला तर "ओ" म्हणून प्रतिसाद कुणाचा येत नाही. सगळंच आलबेल व्हायला एव्हढेही पुरेसे असते.
संतापाची लहेर भान कशाचेच ठेवत नाही. समजून घेणारे नव्हे, आपले म्हणने ऐकून घेणारे कुणी असत नाही. वाद-चेष्टा-खिल्ली उडवणे स्वत:चे स्वत:लाच रुचत नाही. आलेला किंवा ओढवलेला प्रसंग एक अनुभव म्हणून स्विकारणे सहज जमत नाही.
आपल्या बोटांच्या इशार्यांवर झुकलेलं जग, स्वत:च्या तालावर आपल्याला नाचवेल अशी कल्पनाही केलेली नसते. प्रत्येकाची वेळ येते रटून-रटून त्याची प्रचिती येत नाही. जगाशी भांडन करुन एक झगडा स्वत:चाच स्वत:शी होत असतो. थोड असं केलं तर बरंच काही तसं होवून बसते.
इतरांसोबत झालेलं मग ते काहीही असो, तसंच थोडसं स्वत:सोबत झाले तर तळपायाची आग थेट मस्तकात वणवा पेटवते. कुठे तरी आपणही सामान्य माणसे आहोत हे मानायला स्वत:ची बुद्धी तयार नसते. मुखातून बाहेर पडणारा शब्दांचा लाव्हा, कुणाच्या तरी कानात पडून आसुरी आनंद मिळावा एव्हढीच अपेक्षा असते. ऐकणारा मग कुणीही असो, त्याचा आपल्या आयुष्याशी अथवा परिस्थितिशी काडीचाही संबंध नसला तरी चालेल. थोड स्वत:चे स्वार्थ साध्य करण्यात काय हरकत आहे..?
हळव्या मनाला झालेली इजा परिणाम म्हणून व्यक्त होते. त्याचे उदाहरण अजुन आहेत जसे, संताप अथवा राग अनावर झाला तर हातात जे असेल ते फेकून देणे/मारणे, साध्या सोप्या सहज क्रियेत लहान-सहान चुका होणे, पदराचे टोक किंवा शर्टाच्या कॉलरचे टोक दातांनी कुरतडणे, अतिच आणि असह्य झाले तर झोपेच्या / दुखत नसलेल्या डोक्याच्या गोळ्यांचे सेवन करणे, (तो असल्यास) मद्य किंवा सिगारेट्सचे सेवन वाढणे, जरा कुठे खट्ट झाले तरी खुप चिडणे इ.इ.
कुणी नसलंच समजून घेणारे तर इतर पर्याय असतातच. त्यांवर अंकुश अन् बोट लावणे म्हणजे भळ-भळत्या जखमेवर तिखट-मिठ चोळण्यासारखेच. विचार करत असलेली बुद्धी बंडखोर होते. जे नको करु म्हण्टले / सांगीतले तेच करते. आधार म्हणून वेल सतत झाडाचा टेका शोधत राहाते. परिस्थिती-प्रसंग साधा न शुल्लकच असतो. नकारात्मक विचारांचा भोवरा आणखी-आणखी स्वत:ला मुजोर करतो. कधी-कधी कुणी भेटत समजून घेणारे पण कधी-कधी कुणीच नसते. तेव्हा काय करायचे..?
विसरुन जायचे? सोडून द्यायचे? कि बाजुला करुन अलिप्त राहायचे? उत्तर उपस्थित असलेल्या वर्तमानावर आहे. गर्दीत असाल तर काही क्षण गर्दीत झोकवून द्या स्वत:ला. एकांतात कुठे असाल तर निसर्गात गुंतवून घ्या स्वत:ला. घराच्या बाहेर नसाल तर घरातल्याच एका चादरीची घडी मोडून पुन्हा निट घडी घालता येते का बघा आजमावून. आयुष्य विनतांना थोडी विस्कटलेली विन चांगली दिसत असते. विनत असलेल्याला ठाऊक असतं काय घोळ झालाय पण विनेशी काही संबंध नसलेल्याला सगळं कसं छान-छान वाटत असतं. कुणाचे मन जपणे जेव्हढे सोपे असते ना त्याहून अवघड स्वत:चे मन जपणे होत असते. चालायचेच नाही का???
थोड असं अन् थोड तसं. खुळ मन अन् खुळाच क्षण. घ्यायचे थोडे सांभाळून स्वत:लाच स्वत:साठी..!
--------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment