Powered By Blogger

Friday, January 22, 2016

पुस्तकात..! :-)


♥ क्षण..! ♥

पुस्तकात..!

आपल्याला हवं तसं कथानक पुढे नेता येतं... पाहिजे तो प्रसंग रंगवता येतो... उत्तरार्धात वाचकाला प्रत्येक शब्दावर जगायला अगदी भाग देखील पडता येतं... ओढ लागते म्हणतात प्रेमाची... तसं काहीसं लिहित असतांना जाणवलं कि, समजायचं हे कथानक वाचकांचे आहे... आपण लिहितो त्याला न्याय हीच लोकं देणार आहेत... त्यामुळे आपल्या लिखानाकडून आपण फारश्या अपेक्षा न ठेवता फक्त कागद भरायचा... कागदावरच्या प्रत्येक शब्दाला वाचकच रिता करतो... कारण लेखक कथानकात त्याची गुंतवणूक करतो आणि वाचक त्याची गुंतवणूक लेखकाच्या पुस्तकात करतो... म्हणून चोखंदळ वाचकाला ओळखून लेखकाने त्याच्या पुस्तकाची रचना केली किंवा बदलली तरी पुस्तकीचा शेवट हा पुस्तकाचा वाचकच असणार असतो... कारण दोघांना जोडणारे माध्यम हे पुस्तकच असते... आणि पुस्तकात असतात त्या संवादरुपी मूक संवेदना..!
--------------------------- मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

No comments:

Post a Comment